शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत जीवन नगर येथे विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:32 IST

पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत कुपोषणाचा प्रश्न मिटावा व बालमृत्यू, गरोदर मातामृत्यू कमी करणे ...

पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत कुपोषणाचा प्रश्न मिटावा व बालमृत्यू, गरोदर मातामृत्यू कमी करणे तसेच सुदृढ सृजनशील समाज निर्मितीसाठी राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पोषण आहाराची रॅली काढून विविध पोषण साहित्य रॅलीत समाविष्ट करून वाजत-गाजत आदिवासी रुढी-परंपरांच्या वाद्यासोबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी किशोरवयीन मुली, स्तनदा माता व गरोदर यांच्यामार्फत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेमध्ये उपोषण हा केंद्रबिंदू मानून रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. पोषण आहाराचे महत्त्व विशद करण्यासाठी पोषण आहार प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले होते. चिनोदा बीट पर्यवेक्षिका ललिता खर्डे, आशा भोई, अंजना वळवी, कल्पना पाकळे, मंगला वसावे, मीरा मिस्तरी या पर्यवेक्षकांनी मार्गदर्शन केले.

अंगणवाडी सेविका गुलशन कृष्णा पावरा, कविता सुभाष वसावे व चिनोदा बीट अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती निशा पावरा, ज्योती पावरा यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी जीवन नगर येथील ज्येष्ठ नागरिक वेलजी पावरा, जोधा पावरा, दिलीप पावरा, देसऱ्या पावरा, जोरदार पाटील, भिका पावरा, सुक्राम पावरा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात परिसरातील किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता यांनी सहभाग नोंदवला. यानिमित्ताने पोषण आहाराचे महत्त्व विशद करण्यात महिला बाल विकास विभाग यशस्वी होत आहे, असे ललिता खर्डे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.