संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. आईसाहेब शालिनी जयंत नटावदकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व्हावे म्हणून निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे करिअर अकॅडमीचे उद्घाटन नाशिक येथील वसंत खैरनार यांच्या हस्ते झाले. बारावीनंतर विद्यार्थी ज्या प्रवेश परीक्षांना सामोरे जातात त्या प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले. प्रमुख वक्ते वसंत खैरनार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. वाचन संस्कृतीचे महत्त्व व ती वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे हे आपल्या मनोगतातून त्यांनी मांडले. प्रास्ताविकात हारून कागझी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मिलिंद वडनगरे यांनी संस्थेच्या विज्ञान विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. पुष्पराज पारधी यांनी करिअर अकॅडमीबद्दल तर मकरंद मालपुरे यांनी प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्राबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमास पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, उपाध्यक्ष कुवरसिंग वळवी, सचिव सुहास वसावे, सदस्य जयकुमार वसावे, किसन वळवी, डॉ.रजनी नटावदकर, भगतसिंग पाडवी, मंगला खैरनार, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी, एकलव्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, रामचंद्र वसावे, जलपतसिंग वसावे, डी.एस. वसावे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी तर आभार अशोक पाटील यांनी मानले.