शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

रिक्त पदांमुळे कामांना अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

याबाबत असे की, पाटबंधारे उपविभाग शहादा अंतर्गत सहा शाखा असून, प्रकाशा येथे या विभागाचे मुख्यालय आहे. तर शहादा, सुसरी, ...

याबाबत असे की, पाटबंधारे उपविभाग शहादा अंतर्गत सहा शाखा असून, प्रकाशा येथे या विभागाचे मुख्यालय आहे. तर शहादा, सुसरी, लोंढरे, तळोदा एक, तळोदा दोन येथे ही कार्यालय आहे. या सहा कार्यालयात एकूण ८३ पदे मंजूर असून, त्यापैकी आजच्या स्थितीला फक्त ११ कर्मचारी कार्यरत आहेत,

तर ७२ तर पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांना अनंत अडचणी येत आहे. शिवाय या विभागात उपविभागीय अधिकारी नसल्याने जे आहेत त्यांचा पगार काढण्यासाठी उपविभागीय अधिकारीच नसल्याने त्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले असून, रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.

या रिक्त पदांमुळे लाभदायी क्षेत्रातील शेतकऱ्यांना दाखले मिळत नाहीत. सही करणारे पद रिक्त आहेत म्हणून शेतकऱ्यांची फिरफिर होत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आता तर पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. म्हणून सुसरी व लोंढे (ता.शहादा) येथील धरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे असताना या विभागात उपविभागीय अधिकाऱ्यासह ७२ पदे रिक्त आहेत.

जे ११ कर्मचारी आहेत, त्यांचा पगार काढण्यासाठीदेखील अडचण येत आहेत. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या विभागाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

खालील पदे रिक्त

महत्त्व पूर्ण उपविभागीय अधिकारी एक पद मंजूर आहे. मात्र, तेही रिक्त आहे. कार्यकारी अभियंता श्रेणी दोनचे चार पदे मंजूर आहेत. ही चारही पदे रिक्त आहेत. सहायक स्थापत्य अभियंता चार पदे मंजूर असून, ही चार पदे रिक्त आहेत. तसेच अनुरेखक एक पद मंजूर असून तेही रिक्त आहे. वरिष्ठ लिपिक एक हे पदही रिक्त आहे. तसेच कनिष्ठ लिपिक तीन पदे, दप्तर कारकून पाच पदे असून, चार रिक्त आहेत.

कालवा निरीक्षक १६ पदे आहेत. त्यापैकी चार पदे कार्यरत आहेत तर १२ पदे रिक्त आहेत. मोजणीदार चार पदे मंजूर असूनही चारही पदे रिक्त आहेत. वाहनचालक एक पद मंजूर असून, तेही रिक्त आहे. संदेशक पाच पदे रिक्त, शिपाई पाच पदे रिक्त, चौकीदार पाच पैकी एक कार्यरत आहे, तर चार रिक्त आहेत.

कालवा चौकीदार १४ पदे मंजूर असून, त्यापैकी एक कार्यरत आहे, तर १३ पद रिक्त आहेत. कालवा टपाली १४ मंजूर असून, एक कार्यरत आहे व उर्वरित पदे रिक्त आहेत, अशी अवस्था पाटबंधारे उपविभागाची झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

प्रकाशा येथील कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांनी सांगितले की, दोन-तीन महिन्यांपासून आमचा पगार नाही. शिवाय कामासाठी धुळे किंवा इतर ठिकाणी गेले असतात त्याचाही भत्ता मिळत नाहीत, अशी माहिती देण्यात आलेली आहे.