शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

न्यायालयीन कार्यक्रमात मातृभाषेचा वापर व्हावा : उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती भोसले यांचे नंदुरबारात प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 15:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य राज्यात न्यायालयांच्या कार्यक्रमात मातृभाषेचा मुख्यत्वे वापर केला जातो, परंतु राज्यात मात्र मराठीऐवजी इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी येथील कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली.माजी आमदार बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न्या.दिलीप भोसले यांच्या हस्ते शनिवारी जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य राज्यात न्यायालयांच्या कार्यक्रमात मातृभाषेचा मुख्यत्वे वापर केला जातो, परंतु राज्यात मात्र मराठीऐवजी इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी येथील कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली.माजी आमदार बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न्या.दिलीप भोसले यांच्या हस्ते शनिवारी जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार सुधीर तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, आमदार सुनील गामित, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, धुळ्याचे शिवाजी दहिते, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, अॅड.पद्माकर वळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना न्या.दिलीप भोसले म्हणाले, न्यायालयीन क्षेत्रात काम करतांना महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काम करण्याची संधी मिळाली. गेल्या 30 वर्षाच्या काळात अनेक अनुभव आले. इतर राज्यात भलेही न्यायालयीन कामकाज इंग्रजी भाषेतून होत असेल परंतु न्यायालयाचे सार्वजनिक कार्यक्रम राहिल्यास तेथे मातृभाषेचाच वापर होतो. सर्वच भाषणे आणि विचार मातृभाषेतून व्यक्त केले जातात. याउलट परिस्थिती राज्याची आहे. मातृभाषेला येथे दुय्यम स्थान दिले जाते, त्याऐवजी इंग्रजीचाच सर्वाधिक वापर केला जातो. बटेसिंह रघुवंशी यांचा पुर्णाकृती पुतळा नेहमीच दिपस्तंभासारखी सर्वाना प्रेरण देत राहील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन त्यातून ग्रामिण आणि मागास भागाचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाजकार्य करतांना पद, सत्ता याचा विचार न करता आदी काम करावे व नंतर त्यातून पदांसाठी जागा निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.पालकमंत्री जयकुमार रावल, बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड.राजेंद्र रघुवंशी यांनी केले तर आभार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले.