शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

न्यायालयीन कार्यक्रमात मातृभाषेचा वापर व्हावा : उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती भोसले यांचे नंदुरबारात प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 15:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य राज्यात न्यायालयांच्या कार्यक्रमात मातृभाषेचा मुख्यत्वे वापर केला जातो, परंतु राज्यात मात्र मराठीऐवजी इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी येथील कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली.माजी आमदार बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न्या.दिलीप भोसले यांच्या हस्ते शनिवारी जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य राज्यात न्यायालयांच्या कार्यक्रमात मातृभाषेचा मुख्यत्वे वापर केला जातो, परंतु राज्यात मात्र मराठीऐवजी इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी येथील कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली.माजी आमदार बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न्या.दिलीप भोसले यांच्या हस्ते शनिवारी जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार सुधीर तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, आमदार सुनील गामित, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, धुळ्याचे शिवाजी दहिते, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, अॅड.पद्माकर वळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना न्या.दिलीप भोसले म्हणाले, न्यायालयीन क्षेत्रात काम करतांना महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काम करण्याची संधी मिळाली. गेल्या 30 वर्षाच्या काळात अनेक अनुभव आले. इतर राज्यात भलेही न्यायालयीन कामकाज इंग्रजी भाषेतून होत असेल परंतु न्यायालयाचे सार्वजनिक कार्यक्रम राहिल्यास तेथे मातृभाषेचाच वापर होतो. सर्वच भाषणे आणि विचार मातृभाषेतून व्यक्त केले जातात. याउलट परिस्थिती राज्याची आहे. मातृभाषेला येथे दुय्यम स्थान दिले जाते, त्याऐवजी इंग्रजीचाच सर्वाधिक वापर केला जातो. बटेसिंह रघुवंशी यांचा पुर्णाकृती पुतळा नेहमीच दिपस्तंभासारखी सर्वाना प्रेरण देत राहील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन त्यातून ग्रामिण आणि मागास भागाचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाजकार्य करतांना पद, सत्ता याचा विचार न करता आदी काम करावे व नंतर त्यातून पदांसाठी जागा निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.पालकमंत्री जयकुमार रावल, बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड.राजेंद्र रघुवंशी यांनी केले तर आभार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले.