शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

वस्तू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड द्यावे लागत असून, रस्त्याअभावी गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे.या गावकऱ्यांना रस्ता नसल्याने घर बांधकामासाठी लागणारे साहित्य सिमेंट, रेती, खडी तसेच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणेसह इतर साहित्य नेण्या-आणण्यासाठी गाढवाचा आधार घ्यावा लागतो व वेळेवर गाढव मिळाले नसल्यास खडकाळ घाटमार्गाने पायपीट करून नऊ ते पंधरा किलोमीटर डोक्यावरच जीवनावश्यक वस्तूंचे ओझे घेत अंतर मोजावे लागत आहे.आजारी रूग्णांना रूग्णालयात औषधोपचारासाठी किंवा गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी रूग्णालयात नेण्यासाठी लाकडी दाड्यांना झोळी बांधून त्यात रूग्ण अथवा गर्भवती महिलांना झोपवून ती झोळी घरातील दोन ते चार सदस्य खांद्यावर उचलून पायवाटेने त्यांना रापापूरपर्यंत आणतात. तेथून पुढे तळोदा रूग्णालय गाठावे लागतेतळोदा येथून रापापूरपर्यंत रस्ता असून, रापापूरपासून पुढे नऊ ते दहा किलोमीटर पाल्हाबार, पाल्हाबार ते कुवलीडाबर हे अडीच ते तीन किलो मीटर, कुवलीडाबर ते चिडमाळ तीन किलो मीटर असा घाट वळणचा खडकाळ भाग रस्ता नसल्याने पायवाटेच्या मार्गाने घर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, खडी, रेती, शेतकºयांचे बी-बियाणे, खते यासह जीवनावश्यक वस्तूंचे ओझे रापापूरहुन गाढवावर आणावे लागते व वेळेवर गाढव उपलब्ध झाले नाहीतर स्वत:च हे जीवनावश्यक ओझे डोक्यावर घेऊन घराचे अंतर कापावे लागते.प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मंजूर निधी हा घर बांधकाम साहित्य घरापर्यंत आण्यातच खर्च होत असून, घराचे बांधकामही पूर्ण होत नाही. पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे रस्ता नसल्याने वाहने जाऊ शकत नाही त्यामुळे या गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे. रस्ताअभावी वाहन जाऊ शकत नसल्याने पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे हातपंपदेखील टाकता आले नाही. हातपंपाअभावी पाण्याची सोय होऊ शकली नसल्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करीत नदीच्या किनाºयावर असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. पावसाळ्यात जर नद्यांना पाणी आले की मग नद्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहत बसावे लागते. गुरांनादेखील याच ठिकाणी पाणी पाजण्यासाठी आणावे लागत असल्याचे सांगण्यात आले.रस्ता नसल्याने दळण वळणाचे साधन उपलब्ध होवू शकत नाही. रस्त्याअभावी हातपंप, बोरवेल टाकू शकत नाही. आजारी व्यक्ती व गरोदर मातांना तत्काळ दावाखान्यात दाखल करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना गरीब लोकांनासाठी असून, घरकुलासाठी देण्यात येणारा पैसा हा वाहतुकीतच खर्च होत असल्याने या दुर्गम भागातील लोक कसे घर पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या भागात रस्त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या दुर्गम भागातील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी होत आहे.- गणेश पाडवी, पाल्हाबार