शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वस्तू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड द्यावे लागत असून, रस्त्याअभावी गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे.या गावकऱ्यांना रस्ता नसल्याने घर बांधकामासाठी लागणारे साहित्य सिमेंट, रेती, खडी तसेच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणेसह इतर साहित्य नेण्या-आणण्यासाठी गाढवाचा आधार घ्यावा लागतो व वेळेवर गाढव मिळाले नसल्यास खडकाळ घाटमार्गाने पायपीट करून नऊ ते पंधरा किलोमीटर डोक्यावरच जीवनावश्यक वस्तूंचे ओझे घेत अंतर मोजावे लागत आहे.आजारी रूग्णांना रूग्णालयात औषधोपचारासाठी किंवा गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी रूग्णालयात नेण्यासाठी लाकडी दाड्यांना झोळी बांधून त्यात रूग्ण अथवा गर्भवती महिलांना झोपवून ती झोळी घरातील दोन ते चार सदस्य खांद्यावर उचलून पायवाटेने त्यांना रापापूरपर्यंत आणतात. तेथून पुढे तळोदा रूग्णालय गाठावे लागतेतळोदा येथून रापापूरपर्यंत रस्ता असून, रापापूरपासून पुढे नऊ ते दहा किलोमीटर पाल्हाबार, पाल्हाबार ते कुवलीडाबर हे अडीच ते तीन किलो मीटर, कुवलीडाबर ते चिडमाळ तीन किलो मीटर असा घाट वळणचा खडकाळ भाग रस्ता नसल्याने पायवाटेच्या मार्गाने घर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, खडी, रेती, शेतकºयांचे बी-बियाणे, खते यासह जीवनावश्यक वस्तूंचे ओझे रापापूरहुन गाढवावर आणावे लागते व वेळेवर गाढव उपलब्ध झाले नाहीतर स्वत:च हे जीवनावश्यक ओझे डोक्यावर घेऊन घराचे अंतर कापावे लागते.प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मंजूर निधी हा घर बांधकाम साहित्य घरापर्यंत आण्यातच खर्च होत असून, घराचे बांधकामही पूर्ण होत नाही. पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे रस्ता नसल्याने वाहने जाऊ शकत नाही त्यामुळे या गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे. रस्ताअभावी वाहन जाऊ शकत नसल्याने पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे हातपंपदेखील टाकता आले नाही. हातपंपाअभावी पाण्याची सोय होऊ शकली नसल्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करीत नदीच्या किनाºयावर असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. पावसाळ्यात जर नद्यांना पाणी आले की मग नद्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहत बसावे लागते. गुरांनादेखील याच ठिकाणी पाणी पाजण्यासाठी आणावे लागत असल्याचे सांगण्यात आले.रस्ता नसल्याने दळण वळणाचे साधन उपलब्ध होवू शकत नाही. रस्त्याअभावी हातपंप, बोरवेल टाकू शकत नाही. आजारी व्यक्ती व गरोदर मातांना तत्काळ दावाखान्यात दाखल करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना गरीब लोकांनासाठी असून, घरकुलासाठी देण्यात येणारा पैसा हा वाहतुकीतच खर्च होत असल्याने या दुर्गम भागातील लोक कसे घर पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या भागात रस्त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या दुर्गम भागातील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी होत आहे.- गणेश पाडवी, पाल्हाबार