शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जिल्ह्यात बेमोसमी पावसाच्या सरींनी उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतमाल वाचविण्यासाठी शेतक:यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यातील अनेक भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतमाल वाचविण्यासाठी शेतक:यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम तर काही भागात तुरळक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. परिणामी गेल्या तीन ते चार दिवसांपासून उकाडा आणि ऊनमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या 24 तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे शेती नुकसानीच्या पंचनाम्यांना काहीसा व्यत्यय आला.जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होते. दुपार्पयत अनेक भागात मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी आणि शेतक:यांनीही आधीच उपाययोजना करून ठेवलेल्या होत्या. असे असले तरी या पावसामुळे अनेक भागात शेतमाल वाचविण्यासाठी कसरत झाल्याचे दिसून आले. शेतमाल झाकण्यासाठी धावपळशेतांमध्ये सध्या सोयाबीन, मका, बाजरी काढून ठेवण्यात आली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या पावसात त्याचे नुकसान झालेले होते. जेमतेम आता काही अंशी त्यातील उत्पादन मिळणार असल्यामुळे ते पावसापासून वाचविण्यासाठी शेतक:यांची धावपळ उडाली. काहींनी आधीच हे पीक मळणी करून घरात ठेवले. परंतु कापूस, मिरची, पपई या पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आहेच. परंतु चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने अतिवृष्टीची शक्यताही कमी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतक:यांना दिलासा मिळाला आहे.धान्य व मिरचीचे नुकसानबाजार समितीत सध्या खरीप धान्याची आवक ब:यापैकी सुरू आहे. मिरचीची आवक देखील सुरू झाली असून ती वाळविण्यासाठी पथारींवर टाकली जात आहे. अशातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने धान्य वाचविण्यासाठी व्यापा:यांची धावपळ उडाली. ताडपत्रीद्वारे झाकून आणि काही व्यापा:यांनी थेट शेडमध्ये धान्य ठेवून पावसापासून वाचविण्याचा प्रय} केला.जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमान वाढले होते. उकाडा देखील वाढला होता. ऑक्टोबर हिटचा अनुभव नोव्हेंबर महिन्यात येत होता. परंतु गुरुवारी सकाळपासूनच पावसाच्या तुरळक सरी आणि ढगाळ वातावरण यामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

जिल्ह्यातील नुकसानीचा पंचनाम्याचे काम सुरू असताना पुन्हा 6 व 7 नोव्हेंबर रोजी पाऊस झाला. या पावसामुळे पंचनाम्याच्या कार्यात व्यत्यय आला असला तरी कुठलाही बाधित शेतकरी सुटणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. तर झालेल्या पंचनाम्यांचे चावडीवाचन करण्यासाठी दवंडीद्वारे संदेश द्यावा, जिल्ह्यात पंचनामा केलेल्या शेतीचा संयुक्त अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्याचे आवाहन देखील डॉ.भारुड यांनी केले.