शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मान्यता नसलेल्या संघटनांची दुकानदारी होणार बंद

By admin | Updated: February 17, 2017 01:26 IST

शासनाचा निर्णय : जिल्हा परिषदेंतर्गत एकही संघटनेला मान्यता नाही

नंदुरबार : शासकीय कर्मचा:यांच्या संघटनांना शासन मान्यता नसल्यास त्यांची निवेदने, विज्ञापने विचारात घेण्यात येऊ नयेत, असा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कोणत्याही कर्मचारी संघटनेस शासन मान्यता नसल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत स्पष्ट झाले आहे. शासकीय कर्मचा:यांच्या दररोज नवनवीन संघटना स्थापन होत असतात. त्या माध्यमातून मागण्या करण्यात येतात, आंदोलने करून संबंधित यंत्रणेस वेठीस धरण्यात येते. ही बाब लक्षात घेता शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकताच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शासकीय कर्मचा:यांच्या संघटनांना शासन मान्यता नसल्याची त्यांची निवेदने, मागणी विचारात घेण्यात येऊ, नयेत असा निर्णय घेतला आहे. संघटनांना घटना व नियमांच्या अधीन राहूनच शासन मान्यता देण्यात येते. मात्र शासन मान्यता प्राप्त नसलेल्या कोणत्याही संघटनेला शासकीय कर्मचा:यांशी किंवा अशा कर्मचा:यांच्या वर्गाशी संबंधित कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणतेही अभिवेदन किंवा विज्ञापन सादर करण्याचा किंवा शिष्टमंडळ पाठविण्याचा हक्क असणार नाही. शासन मान्यता प्राप्त नसलेल्या संघटनांकडून शासनाकडे फार मोठय़ा प्रमाणात अभिवेदन प्राप्त होतात. त्यांची दखल घेण्यात येऊ नये. अनेक संघटना या श्रमिक अधिनियमाखाली धर्मादाय आयुक्त यांच्या अंतर्गत नोंदणीकृत असून तसे लेटर हेडवर छापून त्या शासन मान्य असल्याचे समजून शासनाकडे पत्रव्यवहार करीत असतात. परंतु शासन मान्यताप्राप्त संघटनांनीच त्यावर शासन मान्यताप्राप्त असा उल्लेख करणे आवश्यक आहे. शासनाची दिशाभूल केल्यास त्या संघटनेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक संघटनांमध्ये खळबळ उडाली असून, शासन आणि प्रशासन आता अशा संघटनांबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. संघटनांना मान्यतेची तरतूदच नाही4जिल्हा परिषदेंतर्गत शासन मान्यताप्राप्त एकही कर्मचारी संघटना नसल्याची बाब माहिती अधिकारांतर्गत पुढे आली आहे. याबाबत राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे माहितीचा अधिकारान्वये अर्ज दाखल केला होता. 4विभागाने रावजी यादव यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जिल्हा परिषद कर्मचा:यांना जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा नियम 1967 लागू आहेत. या नियमांमध्ये    संघटनांना मान्यता प्रदान करण्याबाबतची तरतूद नाही. त्यामुळे अद्यापर्पयत जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कोणत्याही कर्मचारी संघटनेस शासन मान्यता प्रदान करण्यात आलेली नसल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.