शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

टाकाऊ वस्तूंपासून तयार झाले अनोखे गार्डन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:01 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : टाकाऊ टायर, तेलाचे डबे, शितपेयाच्या बाटल्या यांचा कल्पकतेने       ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : टाकाऊ टायर, तेलाचे डबे, शितपेयाच्या बाटल्या यांचा कल्पकतेने             वापर करून त्यांचे गार्डन तयार करीत     त्यातूनच विद्याथ्र्याना हसतखेळत शिक्षण देण्याचा अनोखा प्रयोग घोगळपाडा, ता.नवापूर येथील शाळेने केला आहे. शाळेने टाकाऊपासून टिकावू तर तयार केलेच, परंतु पर्यावरणाचा देखील संदेश यानिमित्ताने दिला आहे. घोगळपाडा हे नवापूर तालुक्यातील आदिवासी वस्तीचे गाव. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून एक ते चार वर्ग आहेत. शाळेचा विस्तीर्ण परिसराचा उपयोग करून घेण्यासाठी नेहमीच येथे प्रय} झाला आहे. शिक्षकांसह ग्रामस्थांचेही सहकार्य त्यासाठी लाभले आहे. गुणवत्तेबाबत देखील शाळा नेहमीच अव्वल ठरली आहे. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी शाळेने टाकावू वस्तूंचा खुबीने वापर करून त्याचे गार्डन तयार केले. या वस्तूंवर मराठी व इंग्रजी वर्णमाला, अंक, नकाशे आणि भौमितीक आकृत्या काढल्या आहेत. हसतखेळत अभ्यास ही संकल्पना त्यातून राबविण्यात आली आहे. घोगळपाडा      शाळेचे टाकाऊपासून टिकावूचे हे अनोखे गार्डन सध्या शैक्षणिक वतरूळात चर्चेचा विषय ठरले आहे. शाळेचे शिक्षक दिनेश पाटील यांनी सांगितले, उपक्रमशील शाळा म्हणून घोगळपाडा शाळा नेहमीच ओळखली जाते. विद्यार्थी, शिक्षक यांच्या परिश्रमातून आणि गावक:यांच्या सहकार्यातून टाकाऊ टायर, थंडपेयाच्या बाटल्या व  तेलाचे डबे यांचा वापर करून  त्यांना आकर्षक अशी रंग रंगोटी करण्यात आली. त्यातून स्वच्छ व सूंदर अशी बाग तयार झाली आहे. त्यात विविध फुलझाडे व पाम वृक्ष अशा रोपाचे रोपण करण्यात आले आहे. त्याचा शालेय अध्ययन अध्यापनात विशेष परिणाम दिसून येत आहे. टायर वर इंग्रजी वर्णाक्षर व भौमितिक आकार काढण्यात आला असून सुंदरतेसह विद्याथ्र्यांना अध्ययनासाठी त्याची विशेष मदत होत आहे.  गार्डनच्या देखरेखीसाठी विद्याथ्र्यांचे व्यवस्थापन मंडळ स्थापन  करण्यात आले असून त्या माध्यमातून दररोज रोपांना पाणी देणे , निगा राखणे हे काम विद्यार्थी स्वयंप्रेरणेने करत आहेत. बालवयातच त्यांना निसर्गाप्रती आपला आदरभाव ठेवण्याची सहजप्रवृत्ति विकसित होत आहे. सातत्याने या शाळेतून चांगले विद्यार्थी घड़त असून येथून सातत्याने  नवोदयला जाणारे विद्यार्थी अशी शाळेची ओळख निर्माण झालेली आहे. यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी जी. पी.मगर, केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी, मुख्याध्यापक संजय जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. शाळेच्या नावलौकिकासाठी सहशिक्षक वसंत कामडे, अनिल वळवी, दिनेश पाटील, कविता जाधव, ललिता वळवी, साईनाथ पाटील हे परिश्रम घेत आहेत.

बालवयातच जागृती..बालवयातच पर्यावरणाविषयी मुलांच्या मनात जागृती निर्माण केली तर त्याचा त्यांना पुढील आयुष्यासाठी चांगला उपयोग होतो. शिवाय त्यांच्या वागण्यातून घरात, शाळेत याविषयी सकारात्मक परिणाम दिसून येतो. हेच डोळ्यासमोर ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला आहे. खराब टायर, डबे उघडय़ावर पडून राहिल्यास त्यात पाणी साचून डास व मच्छर तयार होतात. शितपेयाच्या बाटल्या गटारीत पडल्यास गटार तुंबण्याचे प्रकार होतात. त्यामुळे विद्याथ्र्याना या बाबी या माध्यमातून समजावून देत त्यांच्यात जागृती आणण्याचा प्रय} शाळेतील शिक्षकांचा दिसून येत आहे.