शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर विस्थापीत वा:यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 127 मिटरपेक्षा अधीक पोहचल्याने डुब क्षेत्रातील अनेक बाधीतांना त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 127 मिटरपेक्षा अधीक पोहचल्याने डुब क्षेत्रातील अनेक बाधीतांना त्याचा फटका बसला आहे. शिवाय तळोदा व शहादा तालुक्यातील पुनर्वसन वसाहतींमधील नागरिकांना देखील पावसाच्या पाण्याचा फटका बसला असून अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. शेती वाहून गेली आहे. शासन, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बाधीतांना हे सर्व सहन करावे लागत असल्याचा आरोप नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला आहे. नंदुरबारात सोमवारी जिल्हाधिका:यांशी चर्चा केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मेधा पाटकर म्हणाल्या, नर्मदेत मूळ गावांची सरदार सरोवर बाधित शेती व पुनर्वन वसाहतीतली तळोदा, शहादा तालुक्यातल्या शेकडो जमिनी व 70 घरे बुडाली. विस्थापितांना देण्यात आलेली बहुतांश जमिनी नदी, नाल्यांच्या पूर क्षेत्रातीलच आहेत. तळोदा, शहादा तालुक्यातील निझरी, वाकी, पोसली नदी, मोठे नाले हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत हे या ना त्या कारणाने रोखले वा गाळाने भरले आहेत. यामुळे पाणी लागलीच निघून ते शेतात घुसते. त्यामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. वसाहतीतील विस्थापितांना हा फार मोठा धक्का आहे.31 जुलै 2017 रोजी सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची गावे खाली करण्याचा सुप्रीम कोर्टाने 8 फेब्रुवारी 2017 ला निर्णय दिल्यानंतर हजारो शेतकरी-शेतमजुरांनी मोठाच संघर्ष उभा केला. त्यानंतर मध्यप्रदेशच्या नर्मदा विस्थापितांसाठी 900 कोटींचे पॅकेज जाहीर झाले. महाराष्ट्रातही त्याच सुमारास अनेक बाधितांना जमिनी विकत घेऊन दिल्या गेल्या. तीन नवीन वसाहती निर्माण झाल्या. या परिस्थितीत पूर्ण वसाहत तयार नसताना 38 कुटुंबांचे चिमलखेडी, सिंदुरीवरून स्थलांतर करून पाया बांधणीचे अनुदान न देता घरे बांधायला लावली. काथर्देदिगर, वैजाली, मोड, खरवड, बोरद, करणखेडा यासारख्या वसाहतीत पाण्याचा निचरा, नाले, नद्यांचा पूर्ण विचार हा वसाहत निमार्णाच्या प्रक्रियेत केला नसणे याचे परिणाम कष्टकरी, विस्थापित आदिवासींनाच भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत सरदार सरोवर प्रकल्प व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दोन्ही पूर्ण झाल्याच्या वल्गनाच उघड्या पडल्या आहेत. गुजरात महाराष्ट्राला पुनर्वसनासाठी कायद्यानुसार 30 कोटी देण्याचे व हक्काची वीजही देत नाही तर महाराष्ट्राने आपल्या आदिवासी विस्थापितांना बुडीत भोगू देता कामा नये असे आंदोलनाचे स्पष्ट मत आहे. मूळ गावात आजही निवास करणारी कुटूंबे ही कठीण परिस्थितीत, प्रदूषित पाणीच नव्हे तर बुडित भोगतात, वाहनव्यवस्थाही उपलब्ध नसते. तरीही तिथे याक्षणी डॉक्टरही नाही. विस्थापितांच्या या नुकसानीची भरपाई शासनाने देण्याचा विचार तात्काळ करावा. तशी मागणी केली असल्याचेही मेधा पाटकर यांनी सांगितले. जिल्हाधिका:यांशी चर्चा करणा:यांमध्ये मेधा पाटकर यांच्यासह लतिका राजपूत, चेतन साळवे उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने गुजरातपुढे मान न तुकवता मध्य प्रदेशप्रमाणेच विस्थापितांची खरी संख्या व स्थिती मांडून, विना पूनर्वसन बुडित न आणण्यासाठी गुजरातकडे आवश्यक तर धरणाचे गेट्स खोलण्याची मागणी लावून धरली पाहिजे. त्याचबरोबर पुनर्वन वसाहतींच्या नियोजनातल्या सा:या त्रुटी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी केलीच पाहिजे. संवादातून हे प्रश्न सुटले नाहीत तर 31 जुलै रोजी बडवानी येथे केलेल्या संकल्पाप्रमाणे तीनही राज्यातील हजारो बाधितांकडून संघर्ष हा अटळच असल्याचे आंदोलनाने स्पष्ट केले आहे.