शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

शहरातून परत आलेल्या बेरोजगार तरुणांचा कल शेतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

कोरोना महामारीने दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात कहर केला असून, चालू झालेले उद्योगधंदे - व्यापार शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बंद करावे ...

कोरोना महामारीने दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात कहर केला असून, चालू झालेले उद्योगधंदे - व्यापार शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बंद करावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागातून गेलेले अनेक डिप्लोमाधारक, आयटीआयधारक, पदवीधारक तरुण लॉकडाऊन कधी उघडणार, याची वाट न पाहता घरी परतले आहेत. कारण शहरी भागात महागडे रूम भाडे, वीजबिल भरून आर्थिक टंचाईला सामोरे जाण्यापेक्षा तरुण परत आपापल्या गावी परतले आहेत.

कोरोनामुळे सगळीकडे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम शहरांमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तसेच छोटे - मोठे उद्योग - धंदे करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांवर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जवळ - जवळ सर्व तरुण आपल्या कुटुंबासह आपल्या गावी परतले आहेत. गावी परतल्यावर घरी बसण्यापेक्षा ते सध्या आपल्या वडिलोपार्जित थोड्याफार शेतीत घरच्यांना हातभार लावत आहेत. तसेच ज्या तरुणांकडे शेती नाही, असे तरुण रोजंदारीने सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे चालू असून, तेथे जातांना दिसत आहेत. शेतीतही सध्या पाणी मुबलक असले तरी लॉकडाऊमुळे सर्वच पिकांना भाव नसल्यामुळे सद्यस्थितीत शेती करणेही परवडत नाही. मात्र, या बेरोजगार तरुणांना सध्या शेतीशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी दिसून येत नाही.