शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन काळातील बंद फेऱ्या झाल्या पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एसटीचे चाक थांबले होते. जून महिन्यात एसटी काहीअंशी पूर्ववत सुरू करण्यात आली, परंतु प्रवाशांनी पाठ दाखवल्याने ...

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एसटीचे चाक थांबले होते. जून महिन्यात एसटी काहीअंशी पूर्ववत सुरू करण्यात आली, परंतु प्रवाशांनी पाठ दाखवल्याने दर दिवशीच्या खर्चाचा प्रश्न समोर होता. यातून ऑगस्ट महिन्यापासून काही बसेसला गर्दी वाढू लागल्याने एसटीला पूर्ववत लाभ होत होता. यामुळे नंदुरबार आगाराने बंद केलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. तूर्तास आंतरजिल्हा, जिल्हाबाह्य व परराज्यात एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. नंदुरबार आगारातून दिवसभरात ४५४ फेऱ्या सध्या पूर्ण करण्यात येत असून या माध्यमातून १० लाख रुपयांचे उत्पन्न आगाराला प्राप्त होत आहे. दीर्घ कालावधीनंतर आता शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नंदुरबारकडे वळणार आहेत. यातून पासधारकांची संख्या वाढून दैनंदिन उत्पन्नात दीड ते दोन लाख रुपयांची वाढ होणार आहे. अहिल्याबाई होळकर मुलीना मोफत बसप्रवास योजना अंतर्गत आतापर्यत ७०० मुलींना बस पासेस देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ८०० बस पासेस वाटप करण्यात आली आहे.

१० लाख कमाई

नंदुरबार आगारातून दररोज ३६ हजार ७६० किलोमीटरचा प्रवास होत आहे. यापूर्वी या बसेस ४० हजार किलोमीटर प्रवास करून ९ लाख ५० हजार रुपयांची कमाई करत होत्या. परंतु आता ३६ हजार किलोमीटर अंतरात तब्बल १० लाख रुपयांची कमाई करत असल्याचे दिसून आले आहे. यातून एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लाॅकडाऊन काळात हीच कमाई हजारांच्या घरात गेली होती. एसटीने पुन्हा भरारी धेतल्याने कर्मचारी सुखावले आहेत.

सर्वच मार्ग सुरू

प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्हांतर्गत वाहतूकही वेगात सुरु आहे. यांतर्गत सध्या तळोदा २२, अक्कलकुवा ८, धडगाव १०, गुजरात राज्यातील सुरत येथे १०, अंकलेश्वर येथे चार बसेस धावत आहेत. आगारातून वैंदाणे, खोलघर, वसलाई, अलियाबाद, पिपंळनेर, साक्री, दोंडाईचा, सेजवा, हाटमोहिदा, पाचमाैली, बलदाणे, बोराळा आणि वडझाकण या १६ ठिकाणी मुक्कामी बसेस सुरु आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी लॉक डाऊन च्या आधीच्या सर्व बसफेऱ्या पूर्वपदावर करण्यात आल्या आहेत. मानव विकास बससेवा लवकर सुरू करण्यात येेणार आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास न करता बसने सुरक्षित प्रवास करावे. नंदुरबार आगारातून नियमित बसेस सोडत प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत.

-मनोज पवार,

आगारप्रमुख,

ग्रामीण भागातून इतर ठिकाणी जाण्यासाठी एसटी हे सुरक्षित व सोयीचे वाहन आहे. एसटी पुन्हा सुरू झाल्याने समाधान आहे. ग्रामीण भागात एसटीमुळे वाहतुकीच्या अडचणी दूर होतात.

-मनोहर नांद्रे,प्रवासी,

गुजरात राज्यातून नातेवाइकांचे कायम येणे-जाणे असते. सुरत येथे आमचेही जाणे होते. बसेस सुरू झाल्याने तेथील नातलगांसोबत संपर्क होत आहे. रेल्वे बंद असल्याने एसटी सोयीची आहे.

-राकेश माळी, नंदुरबार,