शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उज्वला योजनेचा नवीन 12 हजार कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्रशासनाच्या उज्वला गॅस योजनांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने योजनेचा राज्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : केंद्रशासनाच्या उज्वला गॅस योजनांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने योजनेचा राज्यात विस्तार केला आहे. तळोदा तालुक्यातील साधारण 12 हजार 500 कुटुंबांना लाभ देण्याचा येथील प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. तळोदा येथील पुरवठा शाखेकडून तशी कार्यवाही स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत सुरू करण्यात आली आहे.  तथापि याप्रकरणी दुकानदारांना अर्ज भरतांना कोणताही दूजाभाव न करण्याची सक्त ताकीद देण्याची अपेक्षा लाभार्थ्ीनी व्यक्त केली आहे.दारिद्रय़ रेषेखालील गरीब, गरजू कुटुंबासाठी केंद्रशासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने गेल्या वर्षीपासून उज्वला गॅस योजना सुरू केली आहे. या योजनेत मोठय़ा प्रमाणात गरीब जनतेला मोफत गॅस कनेक्शन मिळालीत. साहजिकच जनतेमधूनदेखील या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. असे असले तरी अजूनही मोठय़ा  प्रमाणात गरीब व गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहिली आहेत. त्यांनाही लाभ देण्यासाठी राज्यशासनाने योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्याच्या वित्त मंत्र्यांनी अर्थ संकल्पीय भाषणात ‘चुलमूक्त-धूरमुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात आतापावेतो 40.63 लक्ष कुटुंबांना गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला आहे. शासनाने आत्महत्याग्रस्त, नक्षलग्रस्त व आकांक्षित जिल्ह्यांचा या विस्तारीत योजनेत समावेश  केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातही ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कार्यवाही महसूल प्रशासनाकडून सुरूही करण्यात आली आहे.तळोदा तालुक्यातील साधारण 12 हजार 500 अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. येथील पुरवठा शाखेने आपल्या रेशन दुकानदारांना लाभाथ्र्याचे अर्ज भरून घेण्याचे  आदेश दिले असून, ग्रामीण भागातून अशा लाभाथ्र्याचे अर्ज भरून            घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी संबंधीत लाभाथ्र्याचे रेशनकार्ड अथवा त्या कार्डात त्यांचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधारकार्ड, बँक पास बुकची सत्यप्रत व दोन पास पोर्ट फोटो अशी कागदपत्रे अपेक्षित  आहेत.तळोदा तालुक्यात साधारण 32 हजार 359 शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. त्यातील 19 हजार 223 जणांना शासनाच्या उज्वला             गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजे अजूनही साडेबारा हजार लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याचे या लाभार्थ्ीना                  योजनेचा लाभ मिळणार आहे. तथापि लाभाथ्र्याचे अर्ज भरतांना दुजाभाव केला जात असल्याचा लाभाथ्र्याच्या तक्रारी असून, बहुसंख्य लाभार्थ्ीना योजनांची माहितीच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुरवठा शाखेने याबाबत गंभीर दखल घेऊन तशा सूचना दुकानदारांना द्याव्यात, अशी लाभार्थ्ीची मागणी आहे.