शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

उधना-जळगाव दुसरा मार्ग 15 एप्रिलपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार-दोंडाईचा या भागातील दुहेरीकरणाचे काम 10 एप्रिलर्पयत पुर्ण होणार असून 15 एप्रिलपासून हा उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. परिणामी जळगाव, नाशिक, धुळे यापेक्षाही रेल्वेमार्गाने सुरत हे सर्वात कमी अंतराचे शहर म्हणून नंदुरबारकरांसाठी सोयीचे ठरणार आहे. उधना ते जळगाव या 306 किलोमिटर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार-दोंडाईचा या भागातील दुहेरीकरणाचे काम 10 एप्रिलर्पयत पुर्ण होणार असून 15 एप्रिलपासून हा उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. परिणामी जळगाव, नाशिक, धुळे यापेक्षाही रेल्वेमार्गाने सुरत हे सर्वात कमी अंतराचे शहर म्हणून नंदुरबारकरांसाठी सोयीचे ठरणार आहे. उधना ते जळगाव या 306 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम 80 टक्के पुर्ण झाले आहे. केवळ उधना ते चलनाथ आणि नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यान काम बाकी होते त्यापैकी उधना ते चलथान या 11 किलोमिटरच्या दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. 21 फेब्रुवारी रोजी त्याची चाचणी घेतली गेली. ती यशस्वी देखील झाली आहे. या 11 किलोमिटरच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी ताशी 120 कि.मी.वेगाने रेल्वेगाडी चालविण्यात आली.  संबधीत विभागाने हिरवा कंदील दिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या 11 किलोमिटरच्या अंतरात मोठय़ा प्रमाणावर रेल्वे गाडय़ांची गर्दी असते. सुरत-मुंबई रेल्वे लाईन देखील याच दरम्यान जोडली जात असल्यामुळे नंदुरबारकडून जाणा:या गाडय़ांना लवकर सिगAल मिळत नाही. आऊटरवर 10 ते 30 मिनिटे थांबावे लागते. परिणामी 11 किलोमिटरच्या अंतरासाठी तेवढा वेळ वाया        जातो. आता दुहेरीकरणानंतर ही समस्या राहणार नसल्याने तो वेळ वाचणार आहे. परिणामी नंदुरबार ते उधना किंवा सुरत हा प्रवास आता  दोन ते सव्वादोन तासांचा राहील   असा अंदाज रेल्वे सुत्रांनी व्यक्त    केला. यामुळे नंदुरबारहून सुरत हे सर्वात जवळचे मेट्रो शहर राहणार आहे. नाशिक येथे जाण्यासाठी बस किंवा कारने पाच ते सहा तासांचा वेळ जातो. जळगावला जाण्यासाठी देखील रेल्वेचे अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता आता सुरत हे सर्वात जवळचे शहर नंदुरबारकरांसाठी ठरणार आहे.उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते. 2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चर्पयत पुर्ण 306 किलोमिटरचे काम पुर्ण झालेले असेल. दरम्यान, नंदुरबार ते दोंडाईचा या 35 ते 40 किलोमिटर अंतराच्या दुहेरीकरणासाठी मार्च 2018 ही मुदत देण्यात आली आहे. गेल्याच आठवडय़ात आलेले पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार गुप्ता यांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त करून ते तातडीने पुर्ण करण्यासंदर्भात सक्त सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता याकडे लक्ष लागून आहे.