शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उधना-जळगाव दुसरा मार्ग 15 एप्रिलपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार-दोंडाईचा या भागातील दुहेरीकरणाचे काम 10 एप्रिलर्पयत पुर्ण होणार असून 15 एप्रिलपासून हा उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. परिणामी जळगाव, नाशिक, धुळे यापेक्षाही रेल्वेमार्गाने सुरत हे सर्वात कमी अंतराचे शहर म्हणून नंदुरबारकरांसाठी सोयीचे ठरणार आहे. उधना ते जळगाव या 306 किलोमिटर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार-दोंडाईचा या भागातील दुहेरीकरणाचे काम 10 एप्रिलर्पयत पुर्ण होणार असून 15 एप्रिलपासून हा उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. परिणामी जळगाव, नाशिक, धुळे यापेक्षाही रेल्वेमार्गाने सुरत हे सर्वात कमी अंतराचे शहर म्हणून नंदुरबारकरांसाठी सोयीचे ठरणार आहे. उधना ते जळगाव या 306 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम 80 टक्के पुर्ण झाले आहे. केवळ उधना ते चलनाथ आणि नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यान काम बाकी होते त्यापैकी उधना ते चलथान या 11 किलोमिटरच्या दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. 21 फेब्रुवारी रोजी त्याची चाचणी घेतली गेली. ती यशस्वी देखील झाली आहे. या 11 किलोमिटरच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी ताशी 120 कि.मी.वेगाने रेल्वेगाडी चालविण्यात आली.  संबधीत विभागाने हिरवा कंदील दिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या 11 किलोमिटरच्या अंतरात मोठय़ा प्रमाणावर रेल्वे गाडय़ांची गर्दी असते. सुरत-मुंबई रेल्वे लाईन देखील याच दरम्यान जोडली जात असल्यामुळे नंदुरबारकडून जाणा:या गाडय़ांना लवकर सिगAल मिळत नाही. आऊटरवर 10 ते 30 मिनिटे थांबावे लागते. परिणामी 11 किलोमिटरच्या अंतरासाठी तेवढा वेळ वाया        जातो. आता दुहेरीकरणानंतर ही समस्या राहणार नसल्याने तो वेळ वाचणार आहे. परिणामी नंदुरबार ते उधना किंवा सुरत हा प्रवास आता  दोन ते सव्वादोन तासांचा राहील   असा अंदाज रेल्वे सुत्रांनी व्यक्त    केला. यामुळे नंदुरबारहून सुरत हे सर्वात जवळचे मेट्रो शहर राहणार आहे. नाशिक येथे जाण्यासाठी बस किंवा कारने पाच ते सहा तासांचा वेळ जातो. जळगावला जाण्यासाठी देखील रेल्वेचे अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता आता सुरत हे सर्वात जवळचे शहर नंदुरबारकरांसाठी ठरणार आहे.उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते. 2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चर्पयत पुर्ण 306 किलोमिटरचे काम पुर्ण झालेले असेल. दरम्यान, नंदुरबार ते दोंडाईचा या 35 ते 40 किलोमिटर अंतराच्या दुहेरीकरणासाठी मार्च 2018 ही मुदत देण्यात आली आहे. गेल्याच आठवडय़ात आलेले पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार गुप्ता यांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त करून ते तातडीने पुर्ण करण्यासंदर्भात सक्त सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता याकडे लक्ष लागून आहे.