शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

उधना-जळगाव दुसरा मार्ग 15 एप्रिलपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार-दोंडाईचा या भागातील दुहेरीकरणाचे काम 10 एप्रिलर्पयत पुर्ण होणार असून 15 एप्रिलपासून हा उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. परिणामी जळगाव, नाशिक, धुळे यापेक्षाही रेल्वेमार्गाने सुरत हे सर्वात कमी अंतराचे शहर म्हणून नंदुरबारकरांसाठी सोयीचे ठरणार आहे. उधना ते जळगाव या 306 किलोमिटर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वेमार्ग दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार-दोंडाईचा या भागातील दुहेरीकरणाचे काम 10 एप्रिलर्पयत पुर्ण होणार असून 15 एप्रिलपासून हा उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. परिणामी जळगाव, नाशिक, धुळे यापेक्षाही रेल्वेमार्गाने सुरत हे सर्वात कमी अंतराचे शहर म्हणून नंदुरबारकरांसाठी सोयीचे ठरणार आहे. उधना ते जळगाव या 306 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम 80 टक्के पुर्ण झाले आहे. केवळ उधना ते चलनाथ आणि नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यान काम बाकी होते त्यापैकी उधना ते चलथान या 11 किलोमिटरच्या दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. 21 फेब्रुवारी रोजी त्याची चाचणी घेतली गेली. ती यशस्वी देखील झाली आहे. या 11 किलोमिटरच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी ताशी 120 कि.मी.वेगाने रेल्वेगाडी चालविण्यात आली.  संबधीत विभागाने हिरवा कंदील दिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या 11 किलोमिटरच्या अंतरात मोठय़ा प्रमाणावर रेल्वे गाडय़ांची गर्दी असते. सुरत-मुंबई रेल्वे लाईन देखील याच दरम्यान जोडली जात असल्यामुळे नंदुरबारकडून जाणा:या गाडय़ांना लवकर सिगAल मिळत नाही. आऊटरवर 10 ते 30 मिनिटे थांबावे लागते. परिणामी 11 किलोमिटरच्या अंतरासाठी तेवढा वेळ वाया        जातो. आता दुहेरीकरणानंतर ही समस्या राहणार नसल्याने तो वेळ वाचणार आहे. परिणामी नंदुरबार ते उधना किंवा सुरत हा प्रवास आता  दोन ते सव्वादोन तासांचा राहील   असा अंदाज रेल्वे सुत्रांनी व्यक्त    केला. यामुळे नंदुरबारहून सुरत हे सर्वात जवळचे मेट्रो शहर राहणार आहे. नाशिक येथे जाण्यासाठी बस किंवा कारने पाच ते सहा तासांचा वेळ जातो. जळगावला जाण्यासाठी देखील रेल्वेचे अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता आता सुरत हे सर्वात जवळचे शहर नंदुरबारकरांसाठी ठरणार आहे.उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते. 2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चर्पयत पुर्ण 306 किलोमिटरचे काम पुर्ण झालेले असेल. दरम्यान, नंदुरबार ते दोंडाईचा या 35 ते 40 किलोमिटर अंतराच्या दुहेरीकरणासाठी मार्च 2018 ही मुदत देण्यात आली आहे. गेल्याच आठवडय़ात आलेले पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार गुप्ता यांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त करून ते तातडीने पुर्ण करण्यासंदर्भात सक्त सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता याकडे लक्ष लागून आहे.