शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उधना-जळगाव दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाच्या ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. अधिकृत उद्घाटनही लवकरच होण्याची शक्यता बळावली आहे.उधना-जळगाव या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. अधिकृत उद्घाटनही लवकरच होण्याची शक्यता बळावली आहे.उधना-जळगाव या 306 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी सन 2008-09 मध्ये 715 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली होती. परंतु मुदतीत हे काम पुर्ण न झाल्याने हा खर्च दुप्पट अर्थात एक हजार 390 कोटी रुपयांर्पयत गेला आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात या कामासाठी थोडय़ा-थोडय़ा निधीची तरतुद होत होती. त्यामुळे काम रेंगाळले होते. आता हे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. केवळ नंदुरबार-दोंडाईचा दरम्यान बाकी असलेले हे काम 90 टक्के पुर्ण झाले असून केवळ या दरम्यानच्या नवीन मार्गाची चाचणी घेण्याचे बाकी   आहे.पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा मार्गपश्चिम रेल्वेचा महत्वाचा मानला गेलेला ताप्ती सेक्शनचा या मार्गाचे दुहेरीकरण व्हावे यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती. ती आता पुर्णत्वास येत आहे. 2004-05 मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती. तत्कालीन खासदार माणिकराव गावीत यांनी हा रेल्वेमार्ग मंजुर करून आणला होता. परंतु निधिची तरतूद होत नसल्याने तीन ते चार वर्ष हे काम रखडले होते. अखेर 2008-09 मध्ये या कामासाठी ठोस अशा निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर कामाला वेग आला. त्यासाठी विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.  दरवर्षी निधी मिळत गेल्याने अखेर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. दुप्पटीने वाढला खर्चआधी केवळ 715 कोटी रुपये खर्चाची मंजुरी असलेल्या या रेल्वेमार्गाच्या कामासाठी विलंब होत गेल्याने त्याचा खर्च दुप्पट वाढला. तब्बल एक हजार 390 कोटी रुपयांचा सुधारीत बजेट तयार करून ते काम सुरू करण्यात आले. सध्य स्थितीतही खर्च वाढला आहे.306 किलोमिटर लांबीभुसावळ-सुरत म्हणून हा रेल्वेमार्ग ओळखला जातो. या रेल्वेमार्गापैकी भुसावळ ते जळगाव व सुरत ते उधना या दरम्यान या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आहेच. त्यामुळे उधना ते जळगाव या मार्गाचे अर्थात 306 किलोमिटरचा दुसरा रेल्वे मार्ग टाकला जाणार होता. टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात आले. आधी जळगाव कडून कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चलथान कडून कामाला सुरुवात झाली. असे झाले कामउधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते. 2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान  या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्णत्वास आले आहे.उधना-जळगाव या दरम्यानच्या रेल्वेमार्गापैकी केवळ नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटरचे काम बाकी होते. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांनी मार्च अखेर मुदत दिली होती. रेल्वेच्या संबधित विभागाने ते आव्हान पेलून ते काम मार्च अखेर पुर्ण करण्याचा प्रय} केला आहे. आता रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात येईल. नेहमीच्या वेगात चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. येत्या आठ दिवसात ही चाचणी होणार आहे. त्यानंतर या दुस:या रेल्वे मार्गाचे अधिकृतरित्या उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार    आहे.