शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

उधना-जळगाव दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाच्या ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. अधिकृत उद्घाटनही लवकरच होण्याची शक्यता बळावली आहे.उधना-जळगाव या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. अधिकृत उद्घाटनही लवकरच होण्याची शक्यता बळावली आहे.उधना-जळगाव या 306 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी सन 2008-09 मध्ये 715 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली होती. परंतु मुदतीत हे काम पुर्ण न झाल्याने हा खर्च दुप्पट अर्थात एक हजार 390 कोटी रुपयांर्पयत गेला आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात या कामासाठी थोडय़ा-थोडय़ा निधीची तरतुद होत होती. त्यामुळे काम रेंगाळले होते. आता हे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. केवळ नंदुरबार-दोंडाईचा दरम्यान बाकी असलेले हे काम 90 टक्के पुर्ण झाले असून केवळ या दरम्यानच्या नवीन मार्गाची चाचणी घेण्याचे बाकी   आहे.पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा मार्गपश्चिम रेल्वेचा महत्वाचा मानला गेलेला ताप्ती सेक्शनचा या मार्गाचे दुहेरीकरण व्हावे यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती. ती आता पुर्णत्वास येत आहे. 2004-05 मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती. तत्कालीन खासदार माणिकराव गावीत यांनी हा रेल्वेमार्ग मंजुर करून आणला होता. परंतु निधिची तरतूद होत नसल्याने तीन ते चार वर्ष हे काम रखडले होते. अखेर 2008-09 मध्ये या कामासाठी ठोस अशा निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर कामाला वेग आला. त्यासाठी विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.  दरवर्षी निधी मिळत गेल्याने अखेर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. दुप्पटीने वाढला खर्चआधी केवळ 715 कोटी रुपये खर्चाची मंजुरी असलेल्या या रेल्वेमार्गाच्या कामासाठी विलंब होत गेल्याने त्याचा खर्च दुप्पट वाढला. तब्बल एक हजार 390 कोटी रुपयांचा सुधारीत बजेट तयार करून ते काम सुरू करण्यात आले. सध्य स्थितीतही खर्च वाढला आहे.306 किलोमिटर लांबीभुसावळ-सुरत म्हणून हा रेल्वेमार्ग ओळखला जातो. या रेल्वेमार्गापैकी भुसावळ ते जळगाव व सुरत ते उधना या दरम्यान या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आहेच. त्यामुळे उधना ते जळगाव या मार्गाचे अर्थात 306 किलोमिटरचा दुसरा रेल्वे मार्ग टाकला जाणार होता. टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात आले. आधी जळगाव कडून कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चलथान कडून कामाला सुरुवात झाली. असे झाले कामउधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते. 2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान  या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्णत्वास आले आहे.उधना-जळगाव या दरम्यानच्या रेल्वेमार्गापैकी केवळ नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटरचे काम बाकी होते. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांनी मार्च अखेर मुदत दिली होती. रेल्वेच्या संबधित विभागाने ते आव्हान पेलून ते काम मार्च अखेर पुर्ण करण्याचा प्रय} केला आहे. आता रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात येईल. नेहमीच्या वेगात चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. येत्या आठ दिवसात ही चाचणी होणार आहे. त्यानंतर या दुस:या रेल्वे मार्गाचे अधिकृतरित्या उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार    आहे.