शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

महालक्ष्मी नगरमध्ये सुविधांचा वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सर्व्हे नंबर २८ मध्ये पालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या रस्ते, गटारी आणि ओपन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सर्व्हे नंबर २८ मध्ये पालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या रस्ते, गटारी आणि ओपन प्लेसच्या विकासाची कामे रखडल्याने या भागात असुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पालिकेने त्वरीत सुविधात्मक कामे सुरू करावीत अशी मागणी रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे.यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, महालक्ष्मी नगर सर्व्हे नं. २८ मधील नागरिक या भागात गेल्या २० वर्षांपासून रहिवास करीत आहेत. या भागात रस्ते, गटारींसह विविध सविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.या भागात रस्ते, गटारी व ओपन प्लेसचा विकास व्हावा यासाठी पालिका दरबारी तसेच संबंधीत लोकप्रतिनिधींकडे तगादा लावूनही या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या भागात असुविधांचा महापूर वाहत आहे. रस्ते नसल्याने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यात घरातून बाहेर पडणे मुश्कील होते. त्यातच सांडपाण्याची सोय नसल्याने ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचले आहेत. तसेच रस्त्यावर सांडपाणी येवून अशा पाण्यावर डास मच्छरांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शेजारी प्रभाग क्रमांक चारमध्ये विकासात्मक कामे होत आताना या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे . असा दुजाभाव का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.शहादा पालिकेने शहरातील सर्वच ओपन प्लेस विकसित करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने ओपन प्लेसचा विकासही केला जात आहे. परंतु या भागातील सर्व्हे नं. २८ मधील ओपन प्लेस विकासाची प्रतिक्षा करीत आहे. या ओपनप्लेस विकसीत करावा या संदर्भातील विषय सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असतांना हा ओपन प्लेस का विकसीत केला जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. ओपन प्लेस विकसीत न झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वराहांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे प्रशासनाने या भागाकडे जातीने लक्ष देवून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवून सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा मुलभूत सुविधांसाठी वेळोवेळी पालिकेविरूद्ध येथील नागरिकांना आंदोलन छेडावे लागेल व होणाऱ्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार राहिल आसा ईशारा निवेदनामार्फत देण्यात आला आहे. दरम्यान नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनाही नागरिकांनी निवेदन दिले.निवेदनावर दीपक चौधरी, वसंत बागले, दिनेश बाशिंगे, अनिल वाणी, जितेंद्र मोरे, कन्हैया पाटील, प्रकाश भोई, कुंदन चौधरी, नरेंद्र दीक्षित, महेंद्र बडगुजर, मनोज चौधरी, योगेश सावंत, सुनील आहिरे, नाना बिºहाडे, सुरेंद्र ढोडरे, प्रविण भावसार आदींच्या स्वाक्षºया आहेत.