शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

नंदुरबारात तीन वर्षात दोन हजार विंधन विहिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:53 IST

नंदुरबार :  जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता निम्मे भागात पाणी पुरवठा योजना करणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेता ...

नंदुरबार :  जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता निम्मे भागात पाणी पुरवठा योजना करणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेता सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह अनेक ठिकाणी केवळ विंधन विहिरीवरच पिण्याच्या पाण्याची सोय भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. हीच बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेने विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात तब्ब दोन हजार 212 विंधन विहिरींचे काम केले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशी सुटण्यास मदत झाली आहे. यंदाच्या दुष्काळात या विंधन विहिरी आसरा ठरणार आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील 80 टक्के भाग हा दुर्गम भागात मोडतो. याशिवाय शहादा व नवापूर तालुक्यातील 30 टक्के भागात अशीच स्थिती कमी अधीक प्रमाणात आहे. ही बाब लक्षात घेता पाणी पुरवठा योजना राबवितांना मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विंधन विहिरी घेण्याकडेच सर्वाधिक कल असतो. गेल्या तीन वर्षाचा विचार करता तब्बल दोन हजारापेक्षा अधीक ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यावर कोटय़ावधींचा खर्च झाला आहे.जिल्हा परिषदेने आपल्या विविध योजनांच्या माध्यमातून या विंधन विहिरी केल्या आहेत. गेल्या तीन वर्षाचे चित्र पहाता 2015-16 मध्ये टंचाई कृती आराखडय़ाअंतर्गत 495 विहिरी मंजुर करण्यात आल्या होत्या. पैकी 433 पुर्ण झाल्या.  आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 208 विहिरी घेण्यात आल्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत 102 तर डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत 29 विंधन विहिरी करण्यात आल्या. जवळपास चार कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात आला.2016-17 मध्ये टंचाई अंतर्गत 396 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी 364 पुर्ण झाल्या होत्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत582 पैकी 564 पुर्ण करण्यात आल्या. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 34 विंधन विहिरी करण्यात आल्या. खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 195 पैकी 193 विहिरी पुर्ण करण्यात आल्या होत्या. त्यावर जवळपास सव्वा पाच कोटी रुपये खर्च करण्यात आला. गेल्या वर्षी अर्थात 2017-18 मध्ये आदिवासी उपयोजनेअंतर्गत 500 विंधन विहिरी मंजुर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 248 पुर्ण झाल्या. आमदार स्थानिक विकास अंतर्गत 37 विंधन विहिरी पुर्ण झाल्या आहेत. त्यावर एकुण साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.यंदाच्या वर्षात टंचाई कृती आराखडय़ाअंतर्गत 302 विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेने दुहेरी पंप योजनेअंतर्गत 154 सौरपंप मंजुर केले होते. त्यावर चार कोटी 69 लाख रुपये खर्च अपेक्षीत असून त्यांची कामे देखील पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. हातपंप बसविण्यास उशीरअनेक भागात विंधन विहिरी घेतल्या जात असल्या तरी त्यावर हातपंप बसविण्याबाबत मात्र बरीच उदासिनता दिसून येते. शिवाय हातपंप बसविल्यानंतर नादुरूस्त झाल्यावर त्यांच्या दुरूस्तीकडे देखील फारसे लक्ष दिले जात नसल्याची स्थिती आहे. दुर्गम भागात हे चित्र प्रकर्षाने दिसून येते. यंदा दुष्काळामुळे अनेक अडीचशे गावे व सव्वादोनशे पाडय़ांवर पाणी टंचाई जाणवणार आहे. अशा ठिकाणी या विंधन विहिरी आशादायी चित्र निर्माण करणा:या असल्या तरी त्यांच्या पाण्याची पातळी देखील खोल गेल्याने मोठी समस्या निर्माण होणार आहे.