शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थी लागले एमपीएससीच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

नंदुरबार : राज्य शासनाने २१ मार्च रोजी एमपीएसी पूर्वपरीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातून परीक्षा देणाऱ्या २ हजार ...

नंदुरबार : राज्य शासनाने २१ मार्च रोजी एमपीएसी पूर्वपरीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातून परीक्षा देणाऱ्या २ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यानुसार विद्यार्थी तयारीला लागले असून गुरुवारी पूर्वपरीक्षा घेण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील परीक्षार्थिंनी आंदोलन केले होते.

शासनाकडून वेळोवेळी काेरोनाची कारणे दाखवत एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली होती. यातून अभ्यास करून वर्षभर तयारी करणाऱ्या परीक्षार्थिंना धक्का बसला होता. वाढते वय आणि नोकरीची गरज यामुळे अनेक परीक्षार्थी बेचैन झाले होते. अभ्यास करूनही परीक्षा होत नसल्याने अनेकांचे मानसिक स्वास्थ्य खराब होण्याची वेळ आली होती. अभ्यासासाठी केला जाणारा पुस्तकांचा खर्च, ऑनलाईन सत्र तसेच परीक्षा फीची जुळवाजुळव विद्यार्थी तयार होत होते. परंतु, ऐनवेळी रद्द होणाऱ्या परीक्षेमुळे त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. यातून शासनाने १४ मार्च रोजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी नाराज झाले होते. यातून राज्यभर आंदोलन करण्यात आल्यानंतर शासनाकडून येत्या २१ मार्च रोजी पूर्वपरीक्षा घेण्याचे ठरविले आहे. परीक्षा होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे.

१४ मार्च रोजीचे प्रवेशपत्रच धरले जाणार ग्राह्य

येत्या २१ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी रद्द झालेल्या १४ मार्च रोजीचे प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याची शक्यता आहे. एमपीएससीकडून अधिकृतरित्या तशी माहिती दिलेली नसली तरी यानुसारच प्रक्रिया होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

ऑफलाईन परीक्षा असल्याने प्रशासनाकडून केंद्रांवर केल्या जाणार विविध उपाययोजना

इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नको, असा सवाल करत विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर आले होते. दरम्यान, येत्या २१ मार्च रोजी होणारी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याने प्रशासनाकडून कोविड नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

परीक्षेसाठी जिल्ह्यातील नियुक्त केंद्रांपर्यंत येणे सुकर व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांना बसेस व इतर खासगी वाहनांंचा वापर करावा लागणार आहे. जिल्ह्यातील परीक्षार्थिंसाठी नियुक्त सर्व सहा केंद्रे ही नंदुरबार शहरातच आहेत.

वर्षभरात पाचव्यांदा रद्द झाली पूर्वपरीक्षा

२०२० मध्ये कोरोनामुळे विविध परीक्षा थांबविण्यात आल्या होत्या. सार्वजनिक वावराबाबतच्या निर्बंधांना शिथिलता दिल्यानंतर गेल्या वर्षात नोव्हेंबरपासून पाचवेळा परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली. १४ मार्च रोजीची परीक्षा चार दिवसांआधीच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. सर्वसामान्य विद्यार्थी वर्षभरापासून परीक्षेची तयारी करत होता. त्यात पाचवेळा परीक्षा रद्द करण्यात आल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम होत होता. आता परीक्षा असल्याने विद्यार्थी पुन्हा तयारीला लागले आहेत.

-प्रवीण पाटील,मार्गदर्शक,नंदुरबार.

गेल्या वर्षात कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे वर्षभर तयारीला वेळ मिळाला. नोव्हेंबरपासून परीक्षा होणार असे नियोजन असल्याने त्यादृष्टीने तयारी केली होती. परंतु, वेळोवेळी तारखा लांबल्याने इतर परीक्षांच्या अभ्यासावर परिणाम झाला.

-जयकुमार कणखर, परीक्षार्थी, नंदुरबार.

शासनाने परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. पुन्हा रद्द केले, आता पुन्हा परीक्षा घेणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या या हो-नाही च्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तरीही २१ रोजीच्या परीक्षेसाठी तयारीला वेग दिला आहे.

-चंद्रकांत अनारसे,परीक्षार्थी, नंदुरबार.