शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार गरोदर माता केंद्राच्या योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 12:06 IST

 वसंत मराठे लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील २७ हजार गरोदर मातांची ...

 वसंत मराठेलोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील २७ हजार गरोदर मातांची नोंदणी आरोग्य विभागाने शासनाकडे केली होती. त्यातील दोन हजार लाभार्थींना अजूनही लाभ न मिळाल्याने त्यांना प्रतिक्षा लागून आहे. आरोग्य विभागाच्या प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन उर्वरित महिलांच्या अनुदासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी या लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.कुपोषणाबरोबरच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करून गरोदर मातांच्या पालन पोषणासाठी केंद्र शासनाकडून सन २०१७ पासून प्रधानमंत्री मातृत्व योजना राबविली जात आहे. या योजनेतील लाभ महिला व बालकल्याण विभागामार्फत संबंधित लाभार्थ्यास दिला जात असतो. तथापि लाभार्थ्यांची नोंदणी व प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शासनाच्या मुंबई स्थित कार्यालयात पाठविण्यात येतो.गरीब घटकातील प्रत्येक गरोदर मातेस पाच हजाराची मदत केली जात असते. तिही तीन टप्प्यात दिली जात असते. तिही पहिल्या खेपेच्या गरोदर मातेलाच दिली जाते. सुरूवातीला नोंद केलेल्यावर एक हजार त्यानंतर प्रसुती झाल्यानंतर १५ दिवसांनी असे दिले जाते. केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी यंदा २९ हजार ४४० नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २७०१५ गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली होती. या विभागाच्या आकडेवारीनुसार २४ हजार ८९० गरोदर मातांना त्यांच्या खात्यावर नियमानुसार थेट रक्कम जमा करण्यात आली आहे. अजूनही दोन हजार १२५ मातांना त्याचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना लाभाची प्रतिक्षा लागून आहे.वास्तविक या महिलांनी त्यांचे आधारकार्ड, बँक खाते पुस्तक, माता बालसंगोपन कार्ड अशा सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून आरोग्य विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर प्रकरण दाखल केले होते. शिवाय आरोग्य विभागानेदेखील त्यांची प्रकरणे संबंधित यंत्रणेकडे पाठवून पाठपुरावा केला आहे, असे असताना त्यांना अजूनही त्यांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. आपल्या अनुदानासाठी संबंधित महिला एकात्मिक बाल विकास प्रकल्पात थेटे घालत आहेत. त्यांना अजून अनुदान आले नसल्याचे सांगितले जाते. एकीकडे शासन माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी योजन आखते तर दुसरीकडे त्यांना लाभापासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे शासनाच्या उदासिन भूमिकेबाबत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन दुर्गम तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या वंचित राहिलेल्यांमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उर्वरित लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी ठोस प्रयत्न करावे, अशी मागणी मातांनी केली आहे. दरम्यान, या अनुदानासाठी आरोग्य विभागाने १३ कोटी ५० लाख ७५  हजार रूपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी १० कोटी १२ लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अजूनही तीन कोटी ३८ लाख रूपयांची आवश्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने रक्कम  तातडीने उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे.