शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार हेक्टर पीक पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील साडेचार हजार शेतक:यांच्या साधारण दोन हजार हेक्टर क्षेत्रातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील साडेचार हजार शेतक:यांच्या साधारण दोन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे येथील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या शेतक:यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा असून, शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.गेल्या 15 दिवसांपूर्वी संपूर्ण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावला होता. त्यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. येथील कृषी विभाग व महसूल कर्मचा:यांच्या संयुक्त मोहिमेने युद्धपातळीवर शेतक:यांच्या शेतात जावून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील चार हजार 453 शेतक:यांचे साधारण एक हजार 970 हेक्टर क्षेत्रावरील कापूस, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त कापूस पिकाला फटका बसला आहे. साधारण एक हजा 604 हेक्टर क्षेत्रातील या पिकाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्याखालोखाल ज्वारीचे झाले आहे. 115 हेक्टर ज्वारीचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचेही जवळपास 100 हेक्टरचे नुकसान झाले आहे. याशिवाय केळी व पपई या नगदी पिकांचेही साधारण 25 हेक्टरचे नुकसान झाले आहे.कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. आता पुढील कार्यवाही तातडीने प्रशासनाने करून शेतक:यांना भरपी देण्याची अपेक्षा आहे. शेतक:याचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला आहे. कारण 90 टक्यांपेक्षा अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शेतक:यांचा झालेला खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी रब्बीकडे वळला आहे. परंतु त्यांच्याकडे रब्बीला लागणारा खर्चदेखील हातात नाही. त्यामुळे रब्बीचा पीक पेरा, रासायनिक खतांचा खर्च कुठून आणावा. आधीच त्याने खाजगी सावकाराबरोबरच उधार-उसनवारीने पैसे घेतले आहे. ते पैसे कसे फेडावे अशा विवंचनेत असल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली आहे. शासनाने शेतक:यांचा रब्बी हंगाम लक्षात घेऊन नुकसान भरपाई दिली तर खरीपाचा नुकसानीचा बसलेला फटका विसरून रब्बीकडे निदान त्यांच्या आशा पल्लवीत राहतील. परंतु यासाठी प्रशासन व राजकारण्यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवण्याची अपेक्षा आहे.

तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, तळवे परिसरातील बहुसंख्य शेतक:यांनी अवकाळी झालेल्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधीत यंत्रणेने अद्यापही त्याच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. याबाबत संबंधत शेतक:यांनी तक्रारीही केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना कापसाचे पंचनामे न करण्याचेही महसूल कर्मचा:यांनी सांगितल्याचे हे शेतकरी सांगतात. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने याप्रकरणी दखल घेऊन अशा शेतक:यांच्या कापसाचे पंचनामे करण्याचे आदेश आपल्या कर्मचा:यांना द्यावेत, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे.