शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

दोन लाख ग्रामस्थ ठरणार मालमत्ता पत्रकासाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 12:52 IST

नंदुरबार : शासनाकडून राज्यातील गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन पत्रिका स्वरुपात दस्तावेज तयार करण्याचा निर्णय जाहिर ...

नंदुरबार : शासनाकडून राज्यातील गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन पत्रिका स्वरुपात दस्तावेज तयार करण्याचा निर्णय जाहिर झाला आह़े या निर्णयाचा नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार ग्रामीण मालमत्ताधारकांना लाभ होणार असून त्यांना मालमत्ता पत्रक मिळणार आह़े ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांना स्थावर मालमत्तेचा नमुना आठ देऊनही कर्ज घेण्याची सुविधा आणि मिळकतीला योग्य तो मोबदला मिळत नसल्याचे स्पष्ट झाले होत़े यावर मार्ग काढण्यासाठी शासनाने या मालमत्तांचे संरक्षण व्हावे आणि नकाशे तयार होऊन सिमांकन व्हावे यासाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर ग्रामीण भागात मालमत्तापत्रक झाल्याचा निर्णय घेतला आह़े यातून नंदुरबार जिल्ह्यातील साधारण दोन लाख खातेधारकांना लाभ होणार असून यातून ग्रामपंचायतीला कर आकारणी सोपी होणार आह़े शासनाकडे आदेश काढल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामविकास आणि महसूल विभागाला याबाबत कामकाज करण्याचे आदेश काढण्यात आले असून यासाठी सव्रेक्षण मॅपिंगचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आह़े जिल्ह्यात एकूण 1 लाख 99 हजार 496 मालमत्ताधारक आहेत़ जीआयएसच्या धर्तीवर मॅपिंग सुरु झाल्यानंतर मालमत्ताधारकांची संख्या वाढणार आह़े तूर्तास अक्कलकुवा 17 हजार 942, धडगाव 1 हजार 235, तळोदा 12 हजार 160, शहादा 53 हजार  459, नंदुरबार 63 हजार 427 तर नवापूर तालुक्यात 51 हजार 273 मालमत्ताधारक आहेत़ एकूण 585 ग्रामपंचायतींमधील हे मालमत्ताधारक आहेत़ यात 211 गट तर 374 ग्रामपंचायती स्वतंत्र आहेत़ मालमत्ता पत्रकासासाठी जमिन महसूल अधिनियम 1966 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आह़े यात समाविष्ट करण्यात येणा:या मालमत्ताधारकांना माफक फी लावून पत्रकाचे कामकाज होणार असल्याची माहिती आह़े या पत्रकामुळे जिल्ह्यातील शेती आणि रहिवासी वापर जमिनीची एकूण आकडेवारी समोर येऊन ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांकडून योग्य तेवढीच करवसुली पूर्ण होणार असल्याची माहिती आह़े एकूणएक जमिनीचा वापर तेवढाच कर, अशी स्थिती यातून निर्माण होणार आह़े तूर्तास केवळ घोषणेवर असलेल्या या प्रक्रियेसाठी ग्रामीण मालमत्ताधारकांच्या नमुना आठचे पुर्नसंकलन करण्याचे काम महसूल विभागाकडे देण्यात आल्याची माहिती आह़े एकूण 5 लाख 95 हजार 500 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात शेतीसाठी 3 लाख 17 हजार 973 हेक्टर जमिनीचा वापर करण्यात येतो़ उर्वरित दोन लाख 77 हजार 527 पैकी 74 हजार हेक्टर क्षेत्रात वनक्षेत्र आह़े तर दोन लाख 2 हजार हेक्टर जमिन ही नागरी क्षेत्राच्या अखत्यारित आह़े यातील 53 हजार 283हेक्टर जमिन ही पडीक असून उर्वरित क्षेत्रात निवासी वसाहती आहेत़ शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात विभागणी केल्याने जमिन महसूल वसुली हा त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग यांच्या अखत्यारित आह़े जिल्ह्यात 585 ग्रामपंचायतींच्या मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी पत्रक देण्याचा निर्णय शासनाचा असला तरी अक्कलकुवा, प्रकाशा, लोणखेडा यासह इतर मोठय़ा ग्रामपंचायतींतील रहिवाशांना मालमत्ता पत्रक भूमि अभिलेख विभागाने दिल्याची माहिती आह़े