शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटिशीला अडीच हजार करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार : केंद्र शासनाने पीएम किसान योजनेसोबतच पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५०० शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर झाले होते. ...

नंदुरबार : केंद्र शासनाने पीएम किसान योजनेसोबतच पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५०० शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर झाले होते. दरम्यान त्यांना वार्षिक पेन्शन मिळाली होती. ही पेन्शन परत करण्याची नोटीस देण्यात आल्यानंतर आजवर केवळ १ हजार ८०० शेतकऱ्यांनी रक्कम परत केल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवत पीएम किसान सन्मान निधीतून पेन्शन योजनेचे प्रीमियम भरून देण्याचे तयारी ठेवत केंद्र शासनाने पीएम पेन्शन योजना सुरू केली होती. सन्मान निधीतील या योजनेत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकरी समाविष्ट झाले होते. परंतु यातील ४ हजार ५०० शेतकरी हे करदाते आणि अपात्र असल्याने त्यांना रक्कम परत करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसा प्राप्त झाल्यानंतर १ हजार ३६७ करदात्या शेतकऱ्यांनी एक कोटी ३३ लाख तर अपात्र शेतकऱ्यांनी ४० लाख २४ हजार रुपये परत केले आहेत. २ हजार ६१७ शेतकऱ्यांकडे अद्याप निधी मागणी सुरू आहे.

एक कोटी ७४ लाख वसूल

योजनेतील अपात्र ५१६ शेतकरकऱ्यांकडून महसूल विभागाने ४० लाख २४ हजार तर १ हजार ३६७ करदाते शेतकऱ्यांकडून १ कोटी ३३ लाख ७३ हजार रुपये वसूल केले आहेत. उर्वरित २ हजार ६१७ शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत.

रक्कम परत न करणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने तहसीदारांमार्फत नोटिसा देण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान रक्कम परत न केल्यास त्या-त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून त्यांच्याकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याचप्रकारे वसुली करण्याचे काम करण्यात आले होते.

योजनेतून १ लाख २९ हजार शेतकरी थेट लाभ घेत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना साधारण सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळत आहेत. दरम्यान गेल्या वर्षात साधारण ४० हजार शेतकऱ्यांना बँक खात्यांबाबत अडचणी आल्याचे सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी खाते क्रमांक आणि इतर माहिती व्यवस्थित दिल्यानंतर हा मुद्दा निकाली काढण्यात आला आहे. हे शेतकरी समाधानी आहेत. जिल्ह्यात साधारण पाच हजारच्या जवळपास शेतकऱ्यांना अद्यापही रकमेची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या बँक खात्यांचे अपडेशन सुरू असल्याने ही कारवाई लांबली असल्याचे समजते.

नंदुरबार तालुक्यात अपात्र आणि करदाते शेतकऱ्यांकडून वेळेवर वसुली करण्यात आली होती. वसुलीसाठी एकही शेतकरी शिल्लक नाही. ही योजना आता कृषी विभागाकडे गेली आहे. एका कुटुंबातील व्यक्तीनी योजनेसाठी अर्ज केल्याने ते अपात्र ठरले होते.

-भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, नंदुरबार