शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

जनतेची दिशाभूल करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न : आमदार रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:56 IST

नंदुरबार :  एकाच कामाचे दोनदा बील काढणे पालिकेत शक्यच नाही. मुख्याधिकारी, संबधीत अकाऊंटंट यांची बिलांवर सही असते. जर असा ...

नंदुरबार :  एकाच कामाचे दोनदा बील काढणे पालिकेत शक्यच नाही. मुख्याधिकारी, संबधीत अकाऊंटंट यांची बिलांवर सही असते. जर असा प्रकार खरच झाला असेल तर विरोधकांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्यास शासनाला भाग पाडावे. केवळ पोकळ आरोप करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा शहर विकासाच्या कामांना मदत करून नागरिकांचे प्रश्न सोडवावे असा टोला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चेन्नई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेत विरोधकांना लगावला.भाजपतर्फे दोन दिवसांपूर्वी एकाच कामाचे दोनवेळा बील काढून पालिकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या आरोपाचा आणि मागणीचा समाचार घेत आमदार रघुवंशी म्हणाले, पालिका म्हणजे कुणाची खाजगी कंपनी नाही, कुणीही यावे आणि आपल्या मनाप्रमाणे व्यवहार करावा. येथे शासनाची नजर असते. गैरव्यवहार, गैरकारभार दिसला तर थेट फौजदारी गुन्हे दाखल होतात. निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाते. दोनदा बीलं काढले गेले असतील तर बिलांवर ज्यांची सही असते ते मुख्याधिकारी व संबधीत अकाऊंटंट अडकतात. पहिले त्यांच्यावर फौजदार गुन्हा दाखल होईल एवढे साधे लॉजीक विरोधकांना समजत नसेल तर त्यांची किव करावीशी वाटते. अडीच वर्ष अमळनेर पालिका सांभाळणा:यांना कायदे, नियम माहिती नसतील तर त्यांच्या हातात पालिका आली असती तर काय झाले असते याचा विचार जनतेने करावा. वारंवार तेच आरोप करून जनतेची दिशाभूल चालविली आहे. जनतेने नाकारलेले लोकं चर्चेत राहण्यासाठी दर महिना, दोन महिन्यांनी रघुवंशी परिवारावर असे आरोप करून आपली प्रतिमा मलीन करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. आपल्याला झालेल्या आजाराच्या दु:खापेक्षा असे बोगस आणि खोटे आरोप केले जातात त्याचे जास्त दु:ख असल्याचेही भावनिक उद्गार त्यांनी काढले.शहरात पालिकेव्यतिरिक्त जनतेचे अनेक प्रश्न आहेत. उड्डाणपुलाचा खर्चाचा इंधनावरील सेसचा प्रश्न आहे. नळवा रस्त्यावरील बोगद्यासाठी आपण एक कोटी रुपये मंजुर करून आणले. परंतु हे काम बंद आहे. शहरालगतच्या वसाहतींमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे असे एक ना अनेक प्रश्न असतांना ते सोडविण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदार, आमदारांकडे व सरकारकडे पाठपुरावा करून 2022 च्या पालिका निवडणुकांची तयारी विरोधकांनी करावी असा टोलाही त्यांनी लगावला.तंबाखुमुक्त जिल्ह्याप्रमाणे लवकरच आपण दारूमुक्त नंदनगरी करण्यासाठी मोहिम सुरू करणार आहोत. दारूमुळे शहराचे नाव बदनाम होत आहे. त्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग घेणार असल्याचेही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी सांगितले.