शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

जीव धोक्यात टाकून ग्रामस्थांचा नदीतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : पाडलीच्या ग्रामस्थांना सातपुडय़ातील सर्वात मोठी असलेल्या उदय नदीच्या पाण्यातून ये-जा करीत आपले दैनंदिन काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : पाडलीच्या ग्रामस्थांना सातपुडय़ातील सर्वात मोठी असलेल्या उदय नदीच्या पाण्यातून ये-जा करीत आपले दैनंदिन काम करावे लागत आहे. सद्या पावसाळ्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने चार ते पाच फूट पाण्यातून जीव धोक्यात टाकून ग्रामस्थ नदी ओलांडत आहेत. त्यामुळे याठिकाणी पूल बांधण्याची मागणी जोर धरून आहे.  या परिसरातील नागरिकांना धडगाव येथे ये-जा करण्यासाठी उदय नदीचा वापर करावा लागत असल्याने याठिकाणी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून पूल बांधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्वातंत्र्यानंतरही पाडलीचा एकतोडपाडा येथील नागरिकांना धडगावला येथे -ये-जा करण्यासाठी किंवा इतर गावांशी संपर्क साधण्यासाठी उदय नदीवर पूल नसल्याने नदीपात्रातूनच जीवमुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान येथील बालकांनाही शाळेत नदीपार करून जावे लागते. या पाडलीच्या एक तोडपाडय़ात जिल्हा परिषद शाळा असून, पावसाळ्यात नदीला पूर अथवा  पाणी आल्यास शिक्षकांना  याठिकाणी येता येत नसल्याने विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून, या नदीतून मार्गक्रमण करतांना  अनेकदा रूग्णांना प्राणही गमवावा लागतो. ही सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देवून उदय नदीवर त्वरित पूल बांधणे आवश्यक आहे.  या पुलामुळे परिसरातील पाडे  जोडले जाणार असून, अस्तंबा गावासही त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.