शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

जीव धोक्यात टाकून ग्रामस्थांचा नदीतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : पाडलीच्या ग्रामस्थांना सातपुडय़ातील सर्वात मोठी असलेल्या उदय नदीच्या पाण्यातून ये-जा करीत आपले दैनंदिन काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : पाडलीच्या ग्रामस्थांना सातपुडय़ातील सर्वात मोठी असलेल्या उदय नदीच्या पाण्यातून ये-जा करीत आपले दैनंदिन काम करावे लागत आहे. सद्या पावसाळ्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने चार ते पाच फूट पाण्यातून जीव धोक्यात टाकून ग्रामस्थ नदी ओलांडत आहेत. त्यामुळे याठिकाणी पूल बांधण्याची मागणी जोर धरून आहे.  या परिसरातील नागरिकांना धडगाव येथे ये-जा करण्यासाठी उदय नदीचा वापर करावा लागत असल्याने याठिकाणी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून पूल बांधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्वातंत्र्यानंतरही पाडलीचा एकतोडपाडा येथील नागरिकांना धडगावला येथे -ये-जा करण्यासाठी किंवा इतर गावांशी संपर्क साधण्यासाठी उदय नदीवर पूल नसल्याने नदीपात्रातूनच जीवमुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान येथील बालकांनाही शाळेत नदीपार करून जावे लागते. या पाडलीच्या एक तोडपाडय़ात जिल्हा परिषद शाळा असून, पावसाळ्यात नदीला पूर अथवा  पाणी आल्यास शिक्षकांना  याठिकाणी येता येत नसल्याने विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून, या नदीतून मार्गक्रमण करतांना  अनेकदा रूग्णांना प्राणही गमवावा लागतो. ही सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देवून उदय नदीवर त्वरित पूल बांधणे आवश्यक आहे.  या पुलामुळे परिसरातील पाडे  जोडले जाणार असून, अस्तंबा गावासही त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.