शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर येथील गोमाई नदीवर पूल बांधलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर येथील गोमाई नदीवर पूल बांधलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात या नदीत जास्त पाणी राहत असल्याने नागरिकांचे ये-जा करण्यासाठी हाल होतात. काहीवेळा जास्त पाण्यातून नदीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आता तरी येथे पूल बांधावा, अशी मागणी परिसरातील गावांमधील नागरिकांकडून होत आहे.शहादा तालुक्यातील कवळीथ, गोगापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून गोमाई नदी वाहते. या नदीवर भागापूर येथे पूल नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणात पूर असतो. त्यामुळे ग्रामस्थांचा ये-जा करण्याचा एकमेव मुख्य रस्ता असल्यामुळे गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यामध्ये जर शाळा सुरू राहिल्या तर विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांना ब्राह्मणपुरीपर्यंत पायी यावे लागते. तसेच पूरपरिस्थितीत अचानक प्रकृती बिघडल्यास एखादा रुग्ण दगावण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या नदीवर मोठा पूल बांधण्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाºयाकडे मागणी केली होती. ही मागणी मंजूरदेखील करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करून पाच कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाचे टेंडर निघाले नसल्याचे बोलले जात आहे.गोमाई नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर असतो. ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होतात. पूल बांधण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने याआधी संबंधितांना निवेदने दिली आहेत. परंतु अद्यापही पुलाचे काम सुरू झालेले नाही. संबंधित विभागाने लवकरात लवकर पुलाचे काम सुरू करुन ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवावेत.-नीलेश पाटील,उपसरपंच, भागापूर, ता.शहादा.