शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

महामार्गावरून प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू असलेल्या व दोन ठेकेदार बदललेल्या अमरावती-सुरत महामार्गाच्या नवापूर तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू असलेल्या व दोन ठेकेदार बदललेल्या अमरावती-सुरत महामार्गाच्या नवापूर तालुक्यातील रस्त्याचे काम रखडल्याने महामार्गाची वाट लागली आहे. केंद्रीय भुपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे भुमिपूजन झाले होते. राज्यातील सर्वात दर्जेदार आणि मॉर्डन रस्ता तयार करण्याची घोषणा त्यांनी केली होती. परंतु या रस्त्याचे काम अर्ध्यातूनच बंद पडले असून नवीन ठेकेदारही नियुक्त होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. महामार्गांची अवस्था तर सर्वात भयंकर आहे. एकही महामार्ग सुस्थितीत नाही. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्यात महामार्गही सुटलेला नाही. परंतु अमरावती-सुरत महामार्गाची दुखणे वेगळेच आहे. चौपदरीकरणाच्या नावाखाली हा महामार्ग थेट कोंडाईबारी ते गुजरात हद्दीपर्यंत खोदून ठेवला आहे. आहे तो रस्ताही दुरूस्त होत नसल्याची स्थिती आहे.तिसरा आणि शेवटचा टप्पाफागणे ते नवापूर तालुक्यातील गुजरात हद्दपर्यंतच्या रस्त्याचे काम सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. चौपदरीकरणामुळे आजूबाजुचे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी मातीचे भराव आहेत तर काही ठिकाणी तसाच खोदलेला रस्ता सोडून देण्यात आला. पूर्वीचा डांबरीकरणाचा रस्ता देखील अनेक ठिकाणी खोदलेला आहे. दोन वर्षात हे काम पुर्ण होणे अपेक्षीत असतांना ठेकेदाराने अर्ध्यातून काम सोडल्याने आहे त्या स्थितीत रस्ता सोडून देण्यात आला आहे. थेट कोंडाईबारीपासून ते बेडीकपाडापर्यंत अर्थात गुजरात हद्दपर्यंत हा रस्ता ठिकठिकाणी खड्डयांनी व्यापला आहे. पावसाळ्यात तर दीड ते दोन मिटर खोलीचे खड्डे या रस्त्यावर ठिकठिकाणी पडले होते. अतिवृष्टीमुळे रस्ता व पूल खचल्याने १५ दिवस या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली होती. त्यावेळी हॉटेल व्यावसायिकांनीच वर्गणी गोळा करून महामार्गाची तात्पुरती दुरूस्ती केल होती.पुलांची अवस्थाही खराबया महामार्गावर असलेल्या पुलांची अवस्था देखील अतिशय खराब झाली आहे. रायंगण नदीवरील पुुलाला कठडेच नसल्याने अनेकवेळा अपघात झाले आहेत. काही ठिकाणचे पूल कमकुवत आहेत. पावसाळ्यात रंगावली नदीवरील पुलावरून पाणी गेल्यामुळे या पुलाची अवस्थाही खराब झाली आहे.दुरूस्तीकडेही दुर्लक्षचौपदरीकरणाचे काम होईल तेंव्हा होईल, परंतु आहे त्या रस्त्याची डागडुजी व दुरूस्ती करणे अपेक्षीत असतांना राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. नुकताच निधी मंजूर झाला, परंतु दुरुस्तीच्या कामाची गती फारच संथ आहे. सध्य स्थितीत गुजरात हद्दीकडून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याील अर्थात फागणे, ता.धुळे ते गुजरात हद्दीपर्यंत अर्थात बेडकीपाडापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची निविदा पुन्हा नव्याने मंजुर करण्यात आली आहे. त्याच्या ठेकेदाराचीही नेमणूक झाली असल्याचे बोलले जात आहे. परंतु काम कधी सुरू होईल आणि कधीपर्यंत पुर्ण होईल याची माहिती महामार्ग प्राधिकरण कार्यालयातर्फे देण्यात आली नाही. कार्यालयात संपर्क साधाला असता ही माहिती उपलब्ध नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.