शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शहाद्यात वाहतूक सप्ताहाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:53 IST

वाहतुक सुरक्षा सप्ताह : अनेक चौकात वाहतुकीची कोंडी; नियमांचे उल्लंघन

शहादा : गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत असले तरी शहाद्यात मात्र त्याचा पुरता फज्जा उडाला आहे. शहरातील बस स्थानक, गांधी पुतळा, स्टेट बँक, मेनरोड आदी चौकांमध्ये अनेकजण वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत.दरवर्षी जानेवारी महिन्यात वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यंदा महिनाभर उशिराने सप्ताह साजरा होत आहे. रस्ता सुरक्षासप्ताहावर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात सुरक्षा सप्ताह फक्त उद्घाटना पुरताच मर्यादित असल्याचे दिसून येते. शहरातील डोंगरगाव रोडवरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येत आहेत. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता गाडीच्या मागील बाजूस लटकून प्रवास करताना दिसत आहेत. बस स्थानक परिसरात ही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता मुख्य रस्त्यात उभी केली जातात. आणि त्यातून मार्गाक्रमण करणाºया बसेमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होवून अपघात होताना दिसतात. या परिसरात वाहतूक पोलीस असूनदेखील ते बघ्याची भूमिका घेणे पसंत करतात.शहरातील मध्यभागी असलेला गांधी पुतळा परिसरात एकेरी वाहतूक मार्ग असूनदेखील वाहनधारक नियम मोडतांना दिसून येतात. तसेच डायमंड बेकरी जवळ तीन चाकी वाहनांना प्रवेश बंदी असून, दिवसभर मोठ्या वाहनांची वाहतूक मार्गावर होत असल्यामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते.शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी महिन्या ऐवजी फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात येत आहे. या अभियानात वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जात असून, यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही पुढाकार घेतला जात आहे. मात्र वाहनधारकांमध्ये याविषयी जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. या सोबतच खाजगी वाहतूक करणारी वाहने बेशिस्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून नियम पायदळी तुडवत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.रस्ता सुरक्षा सप्ताहात पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकां विरूद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी स्वत: सह इतरांचे जीव धोक्यात येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे झाल्यास वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल.सप्ताहाच्या कार्यक्रमात वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणारे अपघात आणि त्यात जाणारे जीव यावर बरेच विचारमंथनदेखील झाले. जिल्हा प्रशासन व वरिष्ठांनीही काही आदेश दिले असून, त्यांची अंमलबजावणी होईल तेव्हा होईल किमान सप्ताहात तरी सार्वजनिक वाहतूक करणाºया विभागाने या सप्ताहाच्या सन्मान ठेवणे आवश्यक असताना तसे होताना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. वरिष्ठांनी आदेश देऊन देखील कोणत्याही प्रकारे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती किंवा मोहीम यशस्वी होताना दिसत नाही.