शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रकाशा नजीक अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:04 IST

प्रकाशा बसथांबा ते केदारेश्वर मंदिर रस्ता : रस्ता रोको आंदोलनानंतरही दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सहा दिवसांपूर्वी येथील केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्यावर अवजड वाहनामुळे झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको करून अवजड वाहनांना बंदीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची ये-जा सुरूच असल्याने किरकोळ अपघात होत आहेत.प्रकाशा येथील बसथांब्यापासून तीन रस्ते जातात. तळोदा, शहादा व केदारेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते आहेत. त्यापैकी केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा अरुंद व वळणाचा आहे. तसेच या रस्त्यावर केदारेश्वर मंदिर, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळा, इंग्रजी माध्यम व प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने विद्यार्थी, भाविक,  रुग्ण व कर्मचा:यांची नेहमी वर्दळ राहत असल्याने अवजड वाहनांना बंदी आहे. अवजड वाहनांना बंदी दर्शविणारा फलकही बसथांब्याजवळ लावण्यात आला आहे. मात्र वाहन चालक या सूचनेला न जुमानता सर्रासपणे वाहने नेतात. अवजड वाहनांमुळे नेहमी लहान-मोठे अपघात होतात.16 मे रोजी कवळीथ येथील अभियंता रितेश पाटील हे डय़ुटीवर मोटारसायकलीने जात असताना केदारेश्वर मंदिराजवळील वळणावर समोरुन येणा:या अवजड वाहनाने त्यांना धडक देऊन फरफटत नेले. या घटनेत रितेश पाटील यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी तापी नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन करून हा रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. मात्र पाच दिवस झाले तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीसंबंधी काहीही कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. पाच दिवसात किमान एका वाहतूक पोलीस कर्मचा:याची नेमणूकही झालेली नाही. 18 मे रोजी दोन शिक्षक शहाद्याकडे जात असताना अवजड वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला कट मारला. त्यात दोन्ही जण खाली पडल्याने हाता-पायाला किरकोळ जखमा झाल्या. तसेच रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील वळणावर नंदुरबारकडून येणा:या अवजड वाहनाची धडक मोटारसायकलस्वाराने प्रसंगावधान राखून टाळली. या रस्त्यावर मोटारसायकलस्वार जीव धोक्यात घालून प्रवास करीत असून पोलीस प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.लोखंडी कमान उभारावीप्रकाशा बसथांबा ते केदारेश्वर मंदिर पुलार्पयतच्या रस्त्यावर अवजड वाहने जाऊ नये यासाठी बसथांबा व पुलाजवळ लोखंडी  कमान उभारून अडथळा तयार करण्याची गरज आहे.  तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला,           प्राथमिक आरोग्य केंद्र, आसारामजी आश्रम, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषद शाळेजवळ गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.