शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

प्रकाशा नजीक अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:04 IST

प्रकाशा बसथांबा ते केदारेश्वर मंदिर रस्ता : रस्ता रोको आंदोलनानंतरही दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सहा दिवसांपूर्वी येथील केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्यावर अवजड वाहनामुळे झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको करून अवजड वाहनांना बंदीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची ये-जा सुरूच असल्याने किरकोळ अपघात होत आहेत.प्रकाशा येथील बसथांब्यापासून तीन रस्ते जातात. तळोदा, शहादा व केदारेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते आहेत. त्यापैकी केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा अरुंद व वळणाचा आहे. तसेच या रस्त्यावर केदारेश्वर मंदिर, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळा, इंग्रजी माध्यम व प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने विद्यार्थी, भाविक,  रुग्ण व कर्मचा:यांची नेहमी वर्दळ राहत असल्याने अवजड वाहनांना बंदी आहे. अवजड वाहनांना बंदी दर्शविणारा फलकही बसथांब्याजवळ लावण्यात आला आहे. मात्र वाहन चालक या सूचनेला न जुमानता सर्रासपणे वाहने नेतात. अवजड वाहनांमुळे नेहमी लहान-मोठे अपघात होतात.16 मे रोजी कवळीथ येथील अभियंता रितेश पाटील हे डय़ुटीवर मोटारसायकलीने जात असताना केदारेश्वर मंदिराजवळील वळणावर समोरुन येणा:या अवजड वाहनाने त्यांना धडक देऊन फरफटत नेले. या घटनेत रितेश पाटील यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी तापी नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन करून हा रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. मात्र पाच दिवस झाले तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीसंबंधी काहीही कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. पाच दिवसात किमान एका वाहतूक पोलीस कर्मचा:याची नेमणूकही झालेली नाही. 18 मे रोजी दोन शिक्षक शहाद्याकडे जात असताना अवजड वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला कट मारला. त्यात दोन्ही जण खाली पडल्याने हाता-पायाला किरकोळ जखमा झाल्या. तसेच रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील वळणावर नंदुरबारकडून येणा:या अवजड वाहनाची धडक मोटारसायकलस्वाराने प्रसंगावधान राखून टाळली. या रस्त्यावर मोटारसायकलस्वार जीव धोक्यात घालून प्रवास करीत असून पोलीस प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.लोखंडी कमान उभारावीप्रकाशा बसथांबा ते केदारेश्वर मंदिर पुलार्पयतच्या रस्त्यावर अवजड वाहने जाऊ नये यासाठी बसथांबा व पुलाजवळ लोखंडी  कमान उभारून अडथळा तयार करण्याची गरज आहे.  तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला,           प्राथमिक आरोग्य केंद्र, आसारामजी आश्रम, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषद शाळेजवळ गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.