शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

नवापुरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचा हस्तांतर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:52 IST

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन : दोन लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरासाठी बहुप्रतिक्षित असलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा शनिवारी पार पडला. हा प्रकल्प आता पालिकेच्या ताब्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणूका गावीत, उपनगराध्यक्ष हारुन खाटीक, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, माजी नगरसेवक विनय गावीत, भालचंद्र गावीत, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.नवल पाटील, विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, पालिका मुख्यालयातील राजेंद्र शिंदे, कार्यालय अधीक्षक मिलींद भामरे, अभियंता सुधीर माळी, आर.सी. गावीत, संदीप गावीत, फारुख शाह, जैनु गावीत, जीवन प्राधीकरण विभागाचे अभियंता बी.बी.बागुल, जळगाव केंद्राचे  एस.सी. निकम, अभियंता एम.आर. जाधव, सतिष बागुल, हेमंत जाधव, परशराम ठाकरे, राजू गावीत, वामन अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. दैनंदिन दोन लक्ष लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची सुरुवात  सन 2007 साली करण्यात आली. सन 2012 मधे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष लोटली होती. डिसेंबर 2014 पासून प्रकल्पातून शुध्द पाण्याचे वितरण  सुरु करण्यात आले. प्रकल्पाची उभारणी महामार्गा लगत करण्यात आली असून जलशुध्दीकरण संयंत्र, कर्मचारी निवासस्थान यासह          जलकुंभ उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून एक कोटी 96 लक्ष           37 हजार रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. माणिकराव गावीत यांनी हा प्रकल्प पालिकेची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटार योजना पूर्णत्वाकडे असून लोकविकासाच्या असंख्य योजना राबविण्यात आल्याने   शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे ते म्हणाले. प्रस्तावित करतांना गटनेते          गिरीष गावीत यांनी प्रकल्पाची  तांत्रिक व प्रशासकीय माहिती             दिली. शहर विकासाचा महत्वाचा टप्पा या प्रकल्पामुळे गाठला गेला असून लवकरच नागरिकांना           शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या पोटाच्या विकारांनाही पूर्ण विराम मिळू          शकेल असे ते म्हणाले. शहरात                 या पंचवार्षिकेत झालेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देतांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याचे शेवटी ते म्हणाले.