शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचा हस्तांतर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:52 IST

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन : दोन लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरासाठी बहुप्रतिक्षित असलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा शनिवारी पार पडला. हा प्रकल्प आता पालिकेच्या ताब्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणूका गावीत, उपनगराध्यक्ष हारुन खाटीक, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, माजी नगरसेवक विनय गावीत, भालचंद्र गावीत, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.नवल पाटील, विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, पालिका मुख्यालयातील राजेंद्र शिंदे, कार्यालय अधीक्षक मिलींद भामरे, अभियंता सुधीर माळी, आर.सी. गावीत, संदीप गावीत, फारुख शाह, जैनु गावीत, जीवन प्राधीकरण विभागाचे अभियंता बी.बी.बागुल, जळगाव केंद्राचे  एस.सी. निकम, अभियंता एम.आर. जाधव, सतिष बागुल, हेमंत जाधव, परशराम ठाकरे, राजू गावीत, वामन अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. दैनंदिन दोन लक्ष लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची सुरुवात  सन 2007 साली करण्यात आली. सन 2012 मधे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष लोटली होती. डिसेंबर 2014 पासून प्रकल्पातून शुध्द पाण्याचे वितरण  सुरु करण्यात आले. प्रकल्पाची उभारणी महामार्गा लगत करण्यात आली असून जलशुध्दीकरण संयंत्र, कर्मचारी निवासस्थान यासह          जलकुंभ उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून एक कोटी 96 लक्ष           37 हजार रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. माणिकराव गावीत यांनी हा प्रकल्प पालिकेची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटार योजना पूर्णत्वाकडे असून लोकविकासाच्या असंख्य योजना राबविण्यात आल्याने   शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे ते म्हणाले. प्रस्तावित करतांना गटनेते          गिरीष गावीत यांनी प्रकल्पाची  तांत्रिक व प्रशासकीय माहिती             दिली. शहर विकासाचा महत्वाचा टप्पा या प्रकल्पामुळे गाठला गेला असून लवकरच नागरिकांना           शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या पोटाच्या विकारांनाही पूर्ण विराम मिळू          शकेल असे ते म्हणाले. शहरात                 या पंचवार्षिकेत झालेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देतांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याचे शेवटी ते म्हणाले.