शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पूरग्रस्त बोकळझरचा झाला ‘कायापालट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:19 IST

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देऊन गौरवलेल्या बोकळझर गावाला गेल्या 17 ऑगस्ट रोजी पुराचा फटका बसला होता़  यातून अवघ्या दीड महिन्यात हे गाव सावरले असून पुन्हा स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख प्राप्त करण्याच्या वाटेवर आह़े नवापूर शहराच्या दक्षिणेला आठ ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देऊन गौरवलेल्या बोकळझर गावाला गेल्या 17 ऑगस्ट रोजी पुराचा फटका बसला होता़  यातून अवघ्या दीड महिन्यात हे गाव सावरले असून पुन्हा स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख प्राप्त करण्याच्या वाटेवर आह़े नवापूर शहराच्या दक्षिणेला आठ किलोमीटर अंतरावर टुमदार असे बोकळझर गाव आह़े केवळ 834 लोकसंख्या आणि उणीपुरी 200 घरे असलेल्या या गावाने 17 ऑगस्टच्या रात्री नजीकच वाहणा:या रंगावली नदीचे रौद्ररुप अनुभवल़े काही कळण्याच्या आत गावातील 33 घरे, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली गेली़ गावातील रस्त्यांवरुन पाणीच पाणीच झाल्याचे दिसून आल्यानंतर ग्रामस्थांची धावपळ सुरु झाली़ रात्रभराच्या या हाहाकारानंतर सकाळी पूर ओसरल्यावर गावात गाळ आणि वाहून आलेली झाडेच होती़  प्रशासनातील अधिका:यांना सरपंच राहुल गावीत यांनी माहिती दिल्यानंतर पंचनामे सुरु झाल़े जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी ग्रामस्थांना वस्तूंच्या स्वरूपात मदत केली़ गावातील ज्यांची घरे चांगली होती त्या ग्रामस्थांनी घरे वाहून गेलेल्यांना आधार दिला़ या आधारातून पुन्हा नव्याने स्मार्ट व्हिलेज उभारण्याचा संकल्प झाला आणि कामाला सुरूवात झाली़ 18 ऑगस्टच्या दुपारसत्रानंतर ग्रामस्थांनी चक्क पावडी, कुदळ, कु:हाडी, टोपल्या घेत गाळ उपसा आणि झाडे काढून फेकण्यास सुरूवात केली़ सरपंच राहुल गावीत यांनी ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरद्वारे स्वच्छता सुरू केली़ सर्व सात ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील युवक, पुरूष आणि महिलांचे 10-10 गट तयार करून रस्ते वाटून घेतल़े त्यावर प्रत्येकाने सात ते आठ तास श्रमदान करत पूरग्रस्त गाव ते पुन्हा स्मार्ट व्हिलेज असा प्रवास अवघ्या 15 दिवसात पूर्ण करून दाखवला आह़े पूराची घटना घडून 45 दिवस उलटले आहेत़ तालुक्यात 18 कोटी रुपयांचे नुकसान झाले आह़े परंतू बोकळझर ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या डिजीटल साहित्याची भरपाई मात्र प्रशासनाने केलेली नाही़ स्वबळावर उभ्या राहणा:या या गावाने प्रशासनापुढे हातही पसरला नाही हे विशेष़ ग्रामसेविका कल्पना वसावे, उपसरपंच अमित गावीत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ, अंगणवाडी सेविका,शिक्षक आणि ग्रामस्थांनी या कार्यात वाटा उचचला आह़े