शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पूरग्रस्त बोकळझरचा झाला ‘कायापालट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:19 IST

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देऊन गौरवलेल्या बोकळझर गावाला गेल्या 17 ऑगस्ट रोजी पुराचा फटका बसला होता़  यातून अवघ्या दीड महिन्यात हे गाव सावरले असून पुन्हा स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख प्राप्त करण्याच्या वाटेवर आह़े नवापूर शहराच्या दक्षिणेला आठ ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देऊन गौरवलेल्या बोकळझर गावाला गेल्या 17 ऑगस्ट रोजी पुराचा फटका बसला होता़  यातून अवघ्या दीड महिन्यात हे गाव सावरले असून पुन्हा स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख प्राप्त करण्याच्या वाटेवर आह़े नवापूर शहराच्या दक्षिणेला आठ किलोमीटर अंतरावर टुमदार असे बोकळझर गाव आह़े केवळ 834 लोकसंख्या आणि उणीपुरी 200 घरे असलेल्या या गावाने 17 ऑगस्टच्या रात्री नजीकच वाहणा:या रंगावली नदीचे रौद्ररुप अनुभवल़े काही कळण्याच्या आत गावातील 33 घरे, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली गेली़ गावातील रस्त्यांवरुन पाणीच पाणीच झाल्याचे दिसून आल्यानंतर ग्रामस्थांची धावपळ सुरु झाली़ रात्रभराच्या या हाहाकारानंतर सकाळी पूर ओसरल्यावर गावात गाळ आणि वाहून आलेली झाडेच होती़  प्रशासनातील अधिका:यांना सरपंच राहुल गावीत यांनी माहिती दिल्यानंतर पंचनामे सुरु झाल़े जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी ग्रामस्थांना वस्तूंच्या स्वरूपात मदत केली़ गावातील ज्यांची घरे चांगली होती त्या ग्रामस्थांनी घरे वाहून गेलेल्यांना आधार दिला़ या आधारातून पुन्हा नव्याने स्मार्ट व्हिलेज उभारण्याचा संकल्प झाला आणि कामाला सुरूवात झाली़ 18 ऑगस्टच्या दुपारसत्रानंतर ग्रामस्थांनी चक्क पावडी, कुदळ, कु:हाडी, टोपल्या घेत गाळ उपसा आणि झाडे काढून फेकण्यास सुरूवात केली़ सरपंच राहुल गावीत यांनी ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरद्वारे स्वच्छता सुरू केली़ सर्व सात ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील युवक, पुरूष आणि महिलांचे 10-10 गट तयार करून रस्ते वाटून घेतल़े त्यावर प्रत्येकाने सात ते आठ तास श्रमदान करत पूरग्रस्त गाव ते पुन्हा स्मार्ट व्हिलेज असा प्रवास अवघ्या 15 दिवसात पूर्ण करून दाखवला आह़े पूराची घटना घडून 45 दिवस उलटले आहेत़ तालुक्यात 18 कोटी रुपयांचे नुकसान झाले आह़े परंतू बोकळझर ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या डिजीटल साहित्याची भरपाई मात्र प्रशासनाने केलेली नाही़ स्वबळावर उभ्या राहणा:या या गावाने प्रशासनापुढे हातही पसरला नाही हे विशेष़ ग्रामसेविका कल्पना वसावे, उपसरपंच अमित गावीत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ, अंगणवाडी सेविका,शिक्षक आणि ग्रामस्थांनी या कार्यात वाटा उचचला आह़े