शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील वाहतूक 24 तासानंतर झाली सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढल्यानंतर तब्बल 24 तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून महाराष्ट्रात कारखान्यात उपयोगात येणारे साहित्य घेऊन जात असलेला ट्राला (क्रमांक जीजे-01 सीई- 7951) पेचरीदेव येथील पुलावरील खड्डय़ात अडकल्याने व त्यावरील अवजड साहित्य एका बाजूला झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हा ट्राला पुलाच्या मध्यभागी अडकल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नव्हती. केवळ मोटारसायकल व तीनचाकी रिक्षांची ये-जा सुरू होती. मोठय़ा वाहनांच्या वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी अक्कलकुवा पोलिसांनी कोराई चौफुलीवर बेरिकेट्स लावून मोठी वाहने पुढे जाण्यापासून थांबविण्यात आली होती. त्यामुळे अक्कलकुव्यार्पयत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर पेचरीदेवपासून गुजरातमधील सागबारार्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लांब पल्ल्याच्या बसेस अक्कलकुवा येथून गुजरातमध्ये जाऊ शकत नसल्याने रस्त्यात थांबून असल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर काही बसचालक मोरंबामार्गे मार्गस्थ होत असल्याने वेळ लागत होता. पुलावर अडकलेला ट्रॉला काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढण्यात आला. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. सध्या नेत्रंग-शेवाळी महामार्ग हा तळोदा ते गुजरात सीमेवरील डोडवार्पयत अत्यंत खराब झालेला असून पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने दररोज अपघात होत आहेत. त्यातच अक्कलकुवा येथील वरखेडी नदीवरील पूल व पेचरीदेव येथील पुलावरील दोन्ही बाजूचे कठडे तुटल्यामुळे अपघाताची स्थिती  निर्माण झाली आहे. याकडे  महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.