शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील वाहतूक 24 तासानंतर झाली सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढल्यानंतर तब्बल 24 तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून महाराष्ट्रात कारखान्यात उपयोगात येणारे साहित्य घेऊन जात असलेला ट्राला (क्रमांक जीजे-01 सीई- 7951) पेचरीदेव येथील पुलावरील खड्डय़ात अडकल्याने व त्यावरील अवजड साहित्य एका बाजूला झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हा ट्राला पुलाच्या मध्यभागी अडकल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नव्हती. केवळ मोटारसायकल व तीनचाकी रिक्षांची ये-जा सुरू होती. मोठय़ा वाहनांच्या वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी अक्कलकुवा पोलिसांनी कोराई चौफुलीवर बेरिकेट्स लावून मोठी वाहने पुढे जाण्यापासून थांबविण्यात आली होती. त्यामुळे अक्कलकुव्यार्पयत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर पेचरीदेवपासून गुजरातमधील सागबारार्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लांब पल्ल्याच्या बसेस अक्कलकुवा येथून गुजरातमध्ये जाऊ शकत नसल्याने रस्त्यात थांबून असल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर काही बसचालक मोरंबामार्गे मार्गस्थ होत असल्याने वेळ लागत होता. पुलावर अडकलेला ट्रॉला काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढण्यात आला. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. सध्या नेत्रंग-शेवाळी महामार्ग हा तळोदा ते गुजरात सीमेवरील डोडवार्पयत अत्यंत खराब झालेला असून पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने दररोज अपघात होत आहेत. त्यातच अक्कलकुवा येथील वरखेडी नदीवरील पूल व पेचरीदेव येथील पुलावरील दोन्ही बाजूचे कठडे तुटल्यामुळे अपघाताची स्थिती  निर्माण झाली आहे. याकडे  महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.