शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शहाद्यात अतिक्रमणामुळे वाहतुकीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:50 IST

शहादा येथील स्थिती : दोंडाईचा रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी हातगाडीवर थाटली दुकाने

<p>शहादा : शहरातील दोडाईचा रस्त्यावर शासकीय विश्रामगृह ते स्टेट बँकेसमोरील चौकात भररस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून हा चौक अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.                 पोलीस व पालिका प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहादा शहरातील सर्व रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते व हातगाडीधारकांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. मुख्य रस्त्यावरील व भाजी मार्केटमधील विक्रेते व हातगाडीधारकांच्या मनमानी पध्दतीने होत असलेल्या अतिक्रमणाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत 15 दिवसांपूर्वी  भाजी मार्केटमधील अतिक्रमणे काढली. त्यासोबतच हातगाडी धारकांच्या मनमानी अतिक्रमणाला लगाम लावला होता. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईत सातत्य न ठेवल्याने भाजी मार्केटमध्ये पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. सोबतच हातगाडीधारकही रस्त्यावर कुठेही उभे राहून रहदारीचा प्रश्न निर्माण करीत आहे.  त्यासोबतच आता भाजीपाला विक्रेत्यांनी व हातगाडीधारकांनी हा अतिक्रमणाचा  मोर्चा दोंडाईचा रोडवरील शासकीय विश्रामगृह ते स्टेट बँकेसमोरील चौक व तेथून थेट खरेदी-विक्री संघार्पयत रस्ता काबीज करीत या मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटले आहेत. शहरात  दोंडाईचा रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर रहदारीची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर आहे.  या रस्तालगतच शैक्षणिक संस्था, बँका, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह यासह व्यापारी संकुले असल्याने रहदारी मोठय़ा प्रमाणात आहे. नेमक्या याच रस्त्यावरील चौकापासून ते मुख्य रस्त्यालगत 30 ते 40 भाजीपाला व्यावसायिकांसह हातगाडी धारकांनी अतिक्रमण करीत रहदारीचा प्रश्न गंभीर बनवला आहे. भाजी मार्केटमधीलच काही विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील व्यावसायिकांनीही हा रस्ता काबीज करीत कोणाचाच धाक नसल्याचे दाखवत अतिक्रमण केले आहे. दिवसेंदिवस या अतिक्रमणात वाढच होत आहे. त्यांच्या मनमानी अतिक्रमणामुळे लहान-मोठे अपघातही होत असून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वाढत आहे. या संवेदनशील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न वेगळे वळण घेत असल्याने पोलीस व पालिका  प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष चिंतेचा विषय ठरत आहे. या रस्त्यावरील व्यावसायिकांची अतिक्रमणे तात्काळ हटवली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे    पालिका व पोलीस प्रशासनाने पुन्हा  संयुक्त मोहीम राबवून ही अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.