शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सातपुड्यात आजही गाढवांवर वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाचे ...

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून गाढवच महत्त्वपूर्ण ठरत आहे. या भागात पोहोचण्यात कुचकामी ठरलेल्या शासकीय यंत्रणेपेक्षा गाढवच आपला साथी असे म्हणण्याची वेळ अतिदुर्गम भागातील आदिवासींवर आली आहे. धडगाव तालुक्यातील तोरणमाळपासून थेट मध्य प्रदेश सीमेपर्यंत सातपुड्यातील दुर्गम भागात आजही दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. वीज तर दूर, परंतु चालण्यासाठी रस्तेही नसल्याने डोंगरदऱ्यांमधून त्यांना स्वत:च वाट शोधत जावे लागते. अशा परिस्थितीमुळे या भागात नेमणूक करण्यात आलेले ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी यांचे दर्शन केवळ आठवडे बाजाराच्याच दिवशी होते. या सरकारी मंडळींना तोरणमाळमध्ये गाठण्यासाठी आदिवासींना दमछाक करावी लागते. या विपरित परिस्थितीत सर्वच शासकीय यंत्रणांकडून दुर्लक्षित झालेल्या या दुर्गम भागातील आदिवासींना रस्त्याअभावी गाढवांची मोलाची साथ लाभत आहे.

डोंगरदऱ्यांमधून अन्नधान्याची वाहतूक, विहिरीवरून पाणी आणणे, बियाणे-खत आणणे असो, एवढेच काय शालेय पुस्तकांच्या वाहतुकीचेही काम या भागात गाढवांकडूनच करून घ्यावे लागते. रुग्णाला परिसरातील आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठीही गाढवासोबत बांबुलन्स उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे हालअपेष्टा भोगणाऱ्या या भागातील आदिवासी जनतेला शासकीय यंत्रणेपेक्षा गाढवाची वाहतूकच अधिक विश्वासाची वाटत आहे. त्यामुळे डोंगरात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आपल्या घरी पोहोचविण्यासाठी वाहतुकीसाठी रस्ते नसल्याने गाढवच उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे. यामुळे देश डिजिटल युगाकडे वळत असताना, सातपुड्यातील आदिवासी जनता मात्र यापासून कोसो दूर आहे.

ऊन-वाऱ्यात पायीवारी

सातपुड्यातील डोंगरदऱ्याच्या भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना दळणवळणासाठी रस्तेच नसल्याने, त्यांना बाजारहाट घेऊन जाण्यासाठी गाढवाचा वापर करावा लागतो. यासाठी सुमारे १५ ते २० किलोमीटरहूनही अधिक अंतर ऊन-वाऱ्यात पायी प्रवास करीत आपले घर गाठावे लागते. हालअपेष्टा भोगाव्या लागत असल्याची प्रतिक्रिया सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांनी दिली.