शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सातपुड्यात आजही गाढवांवर वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाचे ...

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून गाढवच महत्त्वपूर्ण ठरत आहे. या भागात पोहोचण्यात कुचकामी ठरलेल्या शासकीय यंत्रणेपेक्षा गाढवच आपला साथी असे म्हणण्याची वेळ अतिदुर्गम भागातील आदिवासींवर आली आहे. धडगाव तालुक्यातील तोरणमाळपासून थेट मध्य प्रदेश सीमेपर्यंत सातपुड्यातील दुर्गम भागात आजही दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. वीज तर दूर, परंतु चालण्यासाठी रस्तेही नसल्याने डोंगरदऱ्यांमधून त्यांना स्वत:च वाट शोधत जावे लागते. अशा परिस्थितीमुळे या भागात नेमणूक करण्यात आलेले ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी यांचे दर्शन केवळ आठवडे बाजाराच्याच दिवशी होते. या सरकारी मंडळींना तोरणमाळमध्ये गाठण्यासाठी आदिवासींना दमछाक करावी लागते. या विपरित परिस्थितीत सर्वच शासकीय यंत्रणांकडून दुर्लक्षित झालेल्या या दुर्गम भागातील आदिवासींना रस्त्याअभावी गाढवांची मोलाची साथ लाभत आहे.

डोंगरदऱ्यांमधून अन्नधान्याची वाहतूक, विहिरीवरून पाणी आणणे, बियाणे-खत आणणे असो, एवढेच काय शालेय पुस्तकांच्या वाहतुकीचेही काम या भागात गाढवांकडूनच करून घ्यावे लागते. रुग्णाला परिसरातील आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठीही गाढवासोबत बांबुलन्स उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे हालअपेष्टा भोगणाऱ्या या भागातील आदिवासी जनतेला शासकीय यंत्रणेपेक्षा गाढवाची वाहतूकच अधिक विश्वासाची वाटत आहे. त्यामुळे डोंगरात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आपल्या घरी पोहोचविण्यासाठी वाहतुकीसाठी रस्ते नसल्याने गाढवच उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे. यामुळे देश डिजिटल युगाकडे वळत असताना, सातपुड्यातील आदिवासी जनता मात्र यापासून कोसो दूर आहे.

ऊन-वाऱ्यात पायीवारी

सातपुड्यातील डोंगरदऱ्याच्या भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना दळणवळणासाठी रस्तेच नसल्याने, त्यांना बाजारहाट घेऊन जाण्यासाठी गाढवाचा वापर करावा लागतो. यासाठी सुमारे १५ ते २० किलोमीटरहूनही अधिक अंतर ऊन-वाऱ्यात पायी प्रवास करीत आपले घर गाठावे लागते. हालअपेष्टा भोगाव्या लागत असल्याची प्रतिक्रिया सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांनी दिली.