शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संथगतीच्या कामाने वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विसरवाडी ते खेतिया रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. याचा पहिला टप्पा असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : विसरवाडी ते खेतिया रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. याचा पहिला टप्पा असलेल्या कोळदा ते खेतिया रस्त्याचे काही ठिकाणी काम संथगतीने होत असल्याने रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक मोठे अपघात झाले असून, यात नाहक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहनचालक मनमानी कारभार करत असून, रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करत असल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्यामुळे सध्या तरी हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे.कोळदा ते खेतिया पावेतोच्या रस्त्याचे काम गत वर्षभरापासून सुरू आहे. सद्या शहादा शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून, या रस्त्याच्या दोन्हीबाजुला गटारी तयार केल्या जात आहेत. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक येणार असल्याने शहादा ते प्रकाशा रस्त्यावरील १३२ के.व्ही. सब स्टेशनपासून ते वनविभाग चौफुलीपावेतोच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुभाजकाचे काम सध्या सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारी तयार करण्यात आल्या आहेत. या गटारीलगत रिकामी चारचाकी वाहने उभी केली जातात. विशेषत : मालट्रक उभ्या राहत असल्याने रस्त्याने जाणाºया दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्ता ओलांडून ये-जा करतांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने आतापावेतो किरकोळ अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजुस ही रिकामी वाहने उभी राहत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नुकतीच याच रस्त्यावर एक घटना घडली. शिरूड चौफूलीच्यापुढे एक ट्रक रस्त्यालगत उभा होता. या ट्रकवर ताडपत्री बांधण्याचे काम सुरू असतांना जोरदार हवेने ताडपत्री उडून रस्त्याने जाणाºया दुचाकी स्वारावर ती पडली. परिणामी अपघात होवून दुचाकीवरील दोघांना जायबंदी व्हावे लागले. त्यांचा दोष नसतांना अपघात झाल्याने रस्त्याने जाणाºया वाहनधारकांनी रोष व्यक्त केला. शहादा शहरातून जाणाºया या रस्त्यालगत उभ्या राहणाºया वाहनधारकंंना संबंधीतांनी सूचना देवून भविष्यातील दुर्घटना टाळण्याची अपेक्षा सुज्ञ वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत सोशल मिडीयातूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दरम्यान, शहादा शहरातून जाणाºया महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या व्यवसायिकांनी थेट गटारीसह रस्त्यावरच व्यवसायाला प्रारंभ केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच संबंधीतांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात या रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, शहादा शहरालगतच्या रस्त्याच्या दोन्ही किनारी वाहने लावण्यात आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रिकामी वाहने रस्त्यालगत उभी राहू नयेत यासाठी संबंधीतांना सूचना करणे गरजेचे झाले आहे.