शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळी पर्यटक सेल्फीच्या नादात घालतात जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलधारा कोसळत असल्यामुळे नदी-नाल्यांना पुरासह डोंगरातील धबधबे प्रवाहित होतात. अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात वर्षा पर्यटन मोठ्या ...

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलधारा कोसळत असल्यामुळे नदी-नाल्यांना पुरासह डोंगरातील धबधबे प्रवाहित होतात. अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात वर्षा पर्यटन मोठ्या प्रमाणात बहरले आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भागातील अनेक धबधबे प्रवाहित झाल्याने या ठिकाणी साधनसुविधा नसल्या तरी पावसाळ्यात पर्यटन करीत आनंद साजरा करण्याचा कल तरुणांमध्ये विशेष आढळून येतो. या पर्यटनस्थळी आपले छायाचित्र काढण्याची ओढ आबालवृद्धांमध्ये असते. धबधब्यांसमोर मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी अनेक साहसी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून मनाजोगे फोटोसेशन करतात. दुर्दैवाने जिल्ह्यातील काही धबधब्याच्या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर सेल्फीचा मोह टाळावा, अथवा आवश्यक ती काळजी घ्यावी ही काळाची गरज आहे.

पर्यटनाला जा मात्र काळजी घ्या...

धडगाव तालुक्यातील बिलगावजवळ मोठा धबधबा आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा धबधबा असल्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. विशेषत: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात या धबधब्याचा प्रवाह कायम असतो. म्हणून पर्यटक व निसर्गप्रेमी मनमुराद आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येतात. उदय नदीवर असलेला बिलगाव येथील धबधबा गेल्या काही वर्षांत पर्यटकांसाठी अक्षरश: जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तेथे संरक्षण भिंत व सूचना फलक तातडीने लावावे, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक व ग्रामस्थांनी केली आहे.

वाल्हेरी धबधबा पर्यटकांसाठी पर्वणीच

तळोदा तालुक्यातील वाल्हेरी माता मंदिर परिसरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या दऱ्या-खोऱ्यांतून कोसळणारे धबधब्याचे पाणी, नागमोडी वाटा, कच्चा रस्ता, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकड्या असे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक मेजवानीच ठरत आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरीही या धबधब्यावर कुठलाही परिणाम होत नाही. येथे चहूबाजूने वेढलेल्या हिरव्यागार टेकड्या, वृक्ष, वेली या निसर्गाच्या सान्निध्यामुळे या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई धबधबा हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात यशवंत तलावातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे दरवर्षी हा धबधबा प्रवाहित होतो. सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळणाऱ्या जलधारा आणि त्यांचे फेसाळते रूप यामुळे या धबधब्याचे सौंदर्य जवळून पाहण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटक येथे दाखल होतात. या ठिकाणी संरक्षणासाठी कठडे करण्यात आले असले तरी या धबधब्याचा आनंद घेताना विशेष काळजी बाळगणे गरजेचे आहे.

धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही

जिल्ह्यातील हे तिन्ही धबधबे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, या ठिकाणी पर्यटकांच्या संरक्षणासाठी कुठल्याही उपाययोजना नाही. वनविभागाच्या हद्दीत हा भाग येत असल्याने येथे वन विभागामार्फत आवश्यक ती खबरदारी बाळगणे व सुरक्षिततेसाठी संरक्षण कठडे असणे अपेक्षित आहे. या धबधब्याची माहिती देणाऱ्या फलकांसह या ठिकाणी असलेला धोका याचाही माहितीदर्शक फलक लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासह प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय सुविधा असणे गरजेचे आहे.