शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पर्यटनस्थळी पर्यटक सेल्फीच्या नादात घालतात जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलधारा कोसळत असल्यामुळे नदी-नाल्यांना पुरासह डोंगरातील धबधबे प्रवाहित होतात. अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात वर्षा पर्यटन मोठ्या ...

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलधारा कोसळत असल्यामुळे नदी-नाल्यांना पुरासह डोंगरातील धबधबे प्रवाहित होतात. अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात वर्षा पर्यटन मोठ्या प्रमाणात बहरले आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम भागातील अनेक धबधबे प्रवाहित झाल्याने या ठिकाणी साधनसुविधा नसल्या तरी पावसाळ्यात पर्यटन करीत आनंद साजरा करण्याचा कल तरुणांमध्ये विशेष आढळून येतो. या पर्यटनस्थळी आपले छायाचित्र काढण्याची ओढ आबालवृद्धांमध्ये असते. धबधब्यांसमोर मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी अनेक साहसी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून मनाजोगे फोटोसेशन करतात. दुर्दैवाने जिल्ह्यातील काही धबधब्याच्या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर सेल्फीचा मोह टाळावा, अथवा आवश्यक ती काळजी घ्यावी ही काळाची गरज आहे.

पर्यटनाला जा मात्र काळजी घ्या...

धडगाव तालुक्यातील बिलगावजवळ मोठा धबधबा आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा धबधबा असल्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. विशेषत: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात या धबधब्याचा प्रवाह कायम असतो. म्हणून पर्यटक व निसर्गप्रेमी मनमुराद आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येतात. उदय नदीवर असलेला बिलगाव येथील धबधबा गेल्या काही वर्षांत पर्यटकांसाठी अक्षरश: जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तेथे संरक्षण भिंत व सूचना फलक तातडीने लावावे, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक व ग्रामस्थांनी केली आहे.

वाल्हेरी धबधबा पर्यटकांसाठी पर्वणीच

तळोदा तालुक्यातील वाल्हेरी माता मंदिर परिसरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या दऱ्या-खोऱ्यांतून कोसळणारे धबधब्याचे पाणी, नागमोडी वाटा, कच्चा रस्ता, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकड्या असे आल्हाददायक वातावरण पर्यटकांना एक मेजवानीच ठरत आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरीही या धबधब्यावर कुठलाही परिणाम होत नाही. येथे चहूबाजूने वेढलेल्या हिरव्यागार टेकड्या, वृक्ष, वेली या निसर्गाच्या सान्निध्यामुळे या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई धबधबा हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात यशवंत तलावातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे दरवर्षी हा धबधबा प्रवाहित होतो. सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळणाऱ्या जलधारा आणि त्यांचे फेसाळते रूप यामुळे या धबधब्याचे सौंदर्य जवळून पाहण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटक येथे दाखल होतात. या ठिकाणी संरक्षणासाठी कठडे करण्यात आले असले तरी या धबधब्याचा आनंद घेताना विशेष काळजी बाळगणे गरजेचे आहे.

धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही

जिल्ह्यातील हे तिन्ही धबधबे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, या ठिकाणी पर्यटकांच्या संरक्षणासाठी कुठल्याही उपाययोजना नाही. वनविभागाच्या हद्दीत हा भाग येत असल्याने येथे वन विभागामार्फत आवश्यक ती खबरदारी बाळगणे व सुरक्षिततेसाठी संरक्षण कठडे असणे अपेक्षित आहे. या धबधब्याची माहिती देणाऱ्या फलकांसह या ठिकाणी असलेला धोका याचाही माहितीदर्शक फलक लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासह प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय सुविधा असणे गरजेचे आहे.