शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांवर मानधन थकल्याने उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

नवापूर : तालुक्यातील उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांना गेल्या १८ महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ...

नवापूर : तालुक्यातील उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांना गेल्या १८ महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी, गटप्रेरक व बीटीपीच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन, समस्या सोडविण्याची मागणी भारतीय ट्रायबल पार्टीने केली आहे.

जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हा परिषदेंतर्गत इतर तालुक्यांतील उमेदच्या गटप्रेरिकांना मानधन मिळालेले आहे, परंतु नवापूर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिकांचे १८ महिन्यांचे थकीत मानधन जिल्हा परिषदेच्या गचाळ कारभारामुळे मिळालेले नाही. थकीत मानधनामुळे गटप्रेरिकांची कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उपासमार होत आहे. अनेक गटप्रेरिका विधवा व काही परितक्त्या महिला असून, काही गटप्रेरिकांचे चार वर्षांपासूनचे तर काहींचे कामावर लागल्यापासूनचे मानधन मिळालेले नाही, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्याच्या वेळी तालुकाध्यक्ष राहुल गावीत, विजय ठाकरे, किरण गावीत, महादू गावीत, आनंद गावीत उपस्थित होते.

अर्जफाटे करूनही उपयोग नाही

गटप्रेरिकांना मानधन मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला अनेक वेळा अर्जफाटे करून अधिकाऱ्यांशी आजपावेतो अनेक वेळा चर्चा केली. चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासने दिली. गटप्रेरिकांना थकीत मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.

जमावबंदीमुळे आंदोलन नाही

जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्यामुळे व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मानधन मिळण्यासाठी सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन, आमरण उपोषण करू शकत नसल्यामुळे, जिल्हा परिषदेचे अधिकारी, ५० महिला गटप्रेरिका व पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा घडवून आणणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील भगवान बिरसामुंडा दालन किंवा रंगावली सभागृहात १९ रोजी किंवा प्रशासन वेळ देईल, त्या वेळेनुसार कोरोना नियमावलीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून शिष्टमंडळाला लेखी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.