शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांवर मानधन थकल्याने उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

नवापूर : तालुक्यातील उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांना गेल्या १८ महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ...

नवापूर : तालुक्यातील उमेदच्या २१६ महिला गटप्रेरिकांना गेल्या १८ महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी, गटप्रेरक व बीटीपीच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन, समस्या सोडविण्याची मागणी भारतीय ट्रायबल पार्टीने केली आहे.

जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हा परिषदेंतर्गत इतर तालुक्यांतील उमेदच्या गटप्रेरिकांना मानधन मिळालेले आहे, परंतु नवापूर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिकांचे १८ महिन्यांचे थकीत मानधन जिल्हा परिषदेच्या गचाळ कारभारामुळे मिळालेले नाही. थकीत मानधनामुळे गटप्रेरिकांची कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उपासमार होत आहे. अनेक गटप्रेरिका विधवा व काही परितक्त्या महिला असून, काही गटप्रेरिकांचे चार वर्षांपासूनचे तर काहींचे कामावर लागल्यापासूनचे मानधन मिळालेले नाही, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्याच्या वेळी तालुकाध्यक्ष राहुल गावीत, विजय ठाकरे, किरण गावीत, महादू गावीत, आनंद गावीत उपस्थित होते.

अर्जफाटे करूनही उपयोग नाही

गटप्रेरिकांना मानधन मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला अनेक वेळा अर्जफाटे करून अधिकाऱ्यांशी आजपावेतो अनेक वेळा चर्चा केली. चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासने दिली. गटप्रेरिकांना थकीत मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.

जमावबंदीमुळे आंदोलन नाही

जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्यामुळे व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मानधन मिळण्यासाठी सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन, आमरण उपोषण करू शकत नसल्यामुळे, जिल्हा परिषदेचे अधिकारी, ५० महिला गटप्रेरिका व पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा घडवून आणणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील भगवान बिरसामुंडा दालन किंवा रंगावली सभागृहात १९ रोजी किंवा प्रशासन वेळ देईल, त्या वेळेनुसार कोरोना नियमावलीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून शिष्टमंडळाला लेखी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.