शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

लॉकडाऊनमुळे टरबूज व खरबूज रस्त्यावर विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

कोरोना महामारीचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी जाणवत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील ...

कोरोना महामारीचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी जाणवत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील महिन्यात कोरोना महामारीचा परिणाम केळी पिकावरही मोठ्या प्रमाणात दिसून आला. रमजान महिन्यात वाढती मागणी असूनदेखील व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे केळीचे उत्पादन खूपच कमी भावाने शेतकऱ्यांना विकावे लागले.

आताही शेतकऱ्यांच्या टरबूज व खरबूज पिकाला भाव मिळत नसून, व्यापारीही फिरकत नाही. व्यापारी आले तर खूपच कमी भावाने टरबूज व खरबुजाची मागणी करत आहेत. म्हणून, नाइलाजास्तव शेतकरी रस्त्यावर आपला माल विकून लावलेला खर्च काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार-उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबूज व खरबुजाची लागवड केली. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर, दर्जेदार बियाण्यांची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे या पिकांची जोपासना केली. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून खरेदीसाठी क्वचित व्यापारी येत असल्यामुळे अत्यंत कमी भावात मागणी करत आहेत. किंबहुना, अनेक वेळेस खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने माल विक्रीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी स्वतः मार्केटपर्यंत आपला माल घेऊन गेला, तर तिथेही खूपच कमी भाव मिळत आहे. एखादवेळेस गाडीभाडेच निघत आहे.

जानेवारी महिन्यात लागवडीच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांना होती. मात्र, फळतोडणीच्या वेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाला मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कठोर निर्बंध लादावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचे वाढते प्रमाण यामुळे शासनाला सरसकट लॉकडाऊन लावावे लागले. तालुक्यातील जयनगर, निंभोरे, वडाळी, कोंढावळ येथील शेतकऱ्यांनी लावलेल्या टरबूज व खरबूज पिकांसाठी व्यापारी भेटत नाही. म्हणून, शेतकऱ्यांना या पिकांसाठी लावलेले भांडवल काढण्यासाठी आपला माल रस्त्यावर घेऊन विक्रीस बसावे लागत आहे.

मी तीन एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली होती. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून व्यापारी कमी भावाने मागणी करत असल्यामुळे भांडवल निघणेही मुश्‍कील झाले आहे. म्हणून, शेतकऱ्यांना नाइलाजास्तव रस्त्यावर आपला माल विकावा लागत आहे.

शेतकरी - सुभाष आनंदसिंग गिरासे, निंभोरे

टरबूज व खरबुजाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर विकावा लागत आहे. फोटो - किशोर माळी, जयनगर