शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

लॉकडाऊनमुळे टरबूज व खरबूज रस्त्यावर विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

कोरोना महामारीचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी जाणवत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील ...

कोरोना महामारीचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी जाणवत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील महिन्यात कोरोना महामारीचा परिणाम केळी पिकावरही मोठ्या प्रमाणात दिसून आला. रमजान महिन्यात वाढती मागणी असूनदेखील व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे केळीचे उत्पादन खूपच कमी भावाने शेतकऱ्यांना विकावे लागले.

आताही शेतकऱ्यांच्या टरबूज व खरबूज पिकाला भाव मिळत नसून, व्यापारीही फिरकत नाही. व्यापारी आले तर खूपच कमी भावाने टरबूज व खरबुजाची मागणी करत आहेत. म्हणून, नाइलाजास्तव शेतकरी रस्त्यावर आपला माल विकून लावलेला खर्च काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार-उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबूज व खरबुजाची लागवड केली. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर, दर्जेदार बियाण्यांची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे या पिकांची जोपासना केली. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून खरेदीसाठी क्वचित व्यापारी येत असल्यामुळे अत्यंत कमी भावात मागणी करत आहेत. किंबहुना, अनेक वेळेस खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने माल विक्रीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी स्वतः मार्केटपर्यंत आपला माल घेऊन गेला, तर तिथेही खूपच कमी भाव मिळत आहे. एखादवेळेस गाडीभाडेच निघत आहे.

जानेवारी महिन्यात लागवडीच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांना होती. मात्र, फळतोडणीच्या वेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाला मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कठोर निर्बंध लादावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचे वाढते प्रमाण यामुळे शासनाला सरसकट लॉकडाऊन लावावे लागले. तालुक्यातील जयनगर, निंभोरे, वडाळी, कोंढावळ येथील शेतकऱ्यांनी लावलेल्या टरबूज व खरबूज पिकांसाठी व्यापारी भेटत नाही. म्हणून, शेतकऱ्यांना या पिकांसाठी लावलेले भांडवल काढण्यासाठी आपला माल रस्त्यावर घेऊन विक्रीस बसावे लागत आहे.

मी तीन एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली होती. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून व्यापारी कमी भावाने मागणी करत असल्यामुळे भांडवल निघणेही मुश्‍कील झाले आहे. म्हणून, शेतकऱ्यांना नाइलाजास्तव रस्त्यावर आपला माल विकावा लागत आहे.

शेतकरी - सुभाष आनंदसिंग गिरासे, निंभोरे

टरबूज व खरबुजाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर विकावा लागत आहे. फोटो - किशोर माळी, जयनगर