शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लाकडी काम करणाऱ्या सुतारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

सध्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या कामांत व्यस्त आहेत. बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील भात पेरणीसाठी चिखलणीची कामे करीत आहेत. ...

सध्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या कामांत व्यस्त आहेत. बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील भात पेरणीसाठी चिखलणीची कामे करीत आहेत. शेतकरी खरीप पेरणीच्या कामात आहेत. शेतात एक तासाच्याा नांगरणीसाठी छोट्या ट्रॅक्टरला ४००, तर मोठ्या ट्रॅक्टरचा ८०० रुपये खर्च येत आहे. मागील काही वर्षांपासून लाकडी नांगर, बैलगाडीसह इतर शेती उपयोगी अवजारे कालबाह्य झाली आहेत. नवनवीन यंत्रामुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती मशागत आता केली जात नाही. दरम्यान, शेतीकामासाठी लागणारी सर्व लोखंडी अवजारे मिळत आहेत. लाकडी अवजारांची वाढती किंमत मजुरी व दुरूस्तीचा खर्च अधिक, तसेच लाकडी अवजारे दोन - तीन वर्षांनी खराब होत असल्याने शेतकरी लोखंडी अवजारे वापरत आहेत. लाकडाच्या तुलनेत लोखंडी अवजारे अधिक उपयुक्त ठरत आहेत. पेरणीसाठी लागणारे लाकडी नांगरही आता कमी होत आहेत. जनावरे सांभाळणे कठीण झाल्यानेही शेतकऱ्यांकडून लोखंडी अवजारांना मागणी आहे. दरम्यान, शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे कधी काळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या सुतार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. रेडिमेड अवजारांमुळे बलुतेदारी अडचणीत आली आहे.

पूर्वी किती नांगर आहेत, यावर सधन शेतकरी ओळखला जायचा, जास्त बैलगाड्या, जास्त नांगर तो मोठा शेतकरी समजला जाई. कमी शेती असेल तरी एक नांगर व बैलजोडी असायची, पण आता शेतीसाठी आधुनिक उपकरणे आली, तसेच गोधन राखण्यासाठी माणूस व चरण्यासाठी जागा नसल्याने आज गोधन कमी झाल्याने लाकडी नांगरही कालबाह्य झाले आहेत.

सध्या बैलगाडीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे बैलजोडी खरेदी करण्यापूर्वी शेतकरी विचार करीत आहेत. इतकेच नव्हे, तर गुरे चरणाच्या जागाही नष्ट झाल्या आहेत, याशिवाय शेतात मजूर मिळत नसल्याने शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा अधिक वापर होत आहे.