शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हलालपूर गावात बिबट्याचा थरार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:34 IST

उपाय योजना कराव्या : सलग आठ दिवसांपासून ग्रामस्थांना होतेय बिबट्याचे दर्शन

कोठार : तळोदा तालुक्यातील हलालपूर येथे मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे़ गुरुवार रात्रीदेखील हलालपूर ग्रामस्थांनी बिबट्याचा थरार अनुभवला़ तसेच शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पुन्हा बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.गुरूवारी रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास हलालपूर येथील गावाजवळ जितेंद्र जैन यांच्या केळीच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने उपस्थित अनेकांची पळापळ झाली. जैन यांच्या शेतातून बिबट्या बाहेर आला़ व त्याने गावातील कुत्र्यांचा पाठलाग करत त्यांना भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याला हुसकावून लावले. कुत्र्यांचा पाठलाग करीत बिबट्या रस्ता ओलांडून दुसऱ्या केळीच्या शेतात शिरला.मागील आठ दिवसांपासून हलालपूर गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वन विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात शनिवार रात्री तीन वाजेच्या सुमारास हलालपूर येथील राजू गिरासे यांच्या घरात बिबट्या घुसला असल्याची माहिती समोर आली आहे. राजू गिरासे यांचा मुलगा सुरेन्द्रसिंग गिरासे हे घरात झोपले असतांना अचानकपणे त्यांना घरात कुणी तरी घुसल्याचा भास झाला. त्यानंतर ते मोबाईलवर गाणी पाहत झोपले़ परंतु पुन्हा त्यांना कसला तरी आवाज आला व त्यांनी मागे वळून पाहिले तर चक्क बिबट्या त्यांच्या मागे असल्याचे त्यांना दिसले़ काही फुटांच्या अंतरावर बिबट्या असल्याचे समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या हातातील मोबाइल खाली पडून बोबडी वळली़ त्या अवस्थेत त्यांनी प्रतिकार करण्यासाठी हातात काही मिळतेय का याचा शोध घेतला. सुरेन्द्रसिंग यांच्या हालचालीमुळे बिबट्यादेखील घाबरला व बाहेर पडला. सुरेंद्रसिंग यांनी खाटेवर उभे राहून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला़ परंतु भितीमुळे त्यांचा आवाजदेखील निघत नसल्याचे सुरेंद्रसिंग गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सुरेंद्रसिंग यांच्यावर बिबट्याने हल्ला केला नाही. दरम्यान, राजू गिरासे यांच्या घरात बकऱ्या बांधल्या असल्यामुळे त्यांना भक्ष्य बनविण्यासाठी बिबट्या घराच्या आत घुसल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकारामुळे वेळ आली होती पण काळ याला नव्हता या युक्तीचा प्रत्यय हलालपूर ग्रामस्थांना आला.शुक्रवारी पुन्हा बिबट्या आठळून आल्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनविभाग घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तत्काळ घटनास्थळी दाखल होईल, असे सर्वांना अपेक्षित होत़े मात्र तब्बल २४ तास उलटुनदेखील वनविभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी आले नव्हते. हलालपूर हे तळोद्यापासून अवघ्या चार ते पाच किमी अंतरावर असूनसुध्दा वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा बळी गेल्यावर पंचनामा करायला वनविभागाचे कर्मचारी येतील का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.