शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांच्या इच्छेचा वाजला नगाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

नंदुरबार पालिकेत सद्यस्थितीत १९ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. एक ते १८ प्रभागातून दोन नगरसेवक ...

नंदुरबार पालिकेत सद्यस्थितीत १९ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. एक ते १८ प्रभागातून दोन नगरसेवक तर १९ क्रमांकाच्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडण्यात आले होते. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे कॉंग्रेसच्या रत्ना चंद्रकांत रघुवंशी या निवडून आल्या होत्या. पक्षीय बलाबल पहाता पालिकेत कॉंग्रेस अर्थात रघुवंशी गटाचे २४ नगरसेवक, भाजपचे ११ तर शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत.

अशी असू शकते पालिकेतील स्थिती

नवीन प्रभाग पद्धतीमुळे शहरातील प्रभाग रचना पूर्णपणे बदलणार आहे. एकूण २१ प्रभाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान दोन नगरसेवक वाढतील, असा अंदाज आहे. प्रभाग रचना ही पूर्वीप्रमाणेच शहराच्या वाघोदा-पातोंडा शिवाराकडून सुरू होऊन शेवट भोणे, चौपाळे शिवाराकडे होणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण, मतदार संख्या या बाबींची रचना निवडणुकीच्या चार महिने आधी होणार आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारीला व चाचपणीला वर्षभर आधीपासूनच सुरुवात केली आहे.

दोघांना द्यावे लागणार मत

एका मतदाराला प्रभागात दोन मते द्यावी लागणार आहेत. अर्थात दोन जणांना निवडून द्यायचे असल्याने दोन उमेदवारांना मते द्यावी लागतील. गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे प्रभागातील दोन किंवा तीन उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार असे तीन किंवा चार ठिकाणी मतदान करावे लागले होते. यामुळे मतदान यंत्रावर यावेळी उमेदवारांची गर्दी कमी राहणार आहे. गेल्या वेळी काही ठिकाणी दोन मतदान यंत्र लावावे लागले होते.

शहर विकासाचे काय?

प्रभाग पद्धतीमुळे शहर विकासाचे काय? असा प्रश्न काहींकडून उपस्थित केला जात आहे. कारण थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची बांधीलकी ही सर्वच शहराची असते. त्यामुळे सर्वच भागात त्यांना सारखा विकास व कामे करावी लागतात. तर प्रभाग पद्धतीत एका प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवक नगराध्यक्ष होत असतो. त्यामुळे विरोधकांच्या प्रभागात कामांबाबत दुजाभाव केला जात असतो, असा आरोप नेहमीच होत असतेा. प्रभाग पद्धतीत त्याचा तोटा राहण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

प्रभाग पद्धतीमुळे सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्यास संधी मिळते. अशा वेळी गरीब व सामान्य उमेदवाराचे भवितव्य उजाडते. त्यातून त्याला न्याय मिळतो. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीत संपूर्ण शहराशी अटॅचमेंट राहून थेट जनतेशी संपर्क येतो. अर्थात शासन निर्णयाचे स्वागत असून, त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी करणार आहोत.

-चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना नेते.