शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांच्या इच्छेचा वाजला नगाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

नंदुरबार पालिकेत सद्यस्थितीत १९ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. एक ते १८ प्रभागातून दोन नगरसेवक ...

नंदुरबार पालिकेत सद्यस्थितीत १९ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते. एक ते १८ प्रभागातून दोन नगरसेवक तर १९ क्रमांकाच्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडण्यात आले होते. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे कॉंग्रेसच्या रत्ना चंद्रकांत रघुवंशी या निवडून आल्या होत्या. पक्षीय बलाबल पहाता पालिकेत कॉंग्रेस अर्थात रघुवंशी गटाचे २४ नगरसेवक, भाजपचे ११ तर शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत.

अशी असू शकते पालिकेतील स्थिती

नवीन प्रभाग पद्धतीमुळे शहरातील प्रभाग रचना पूर्णपणे बदलणार आहे. एकूण २१ प्रभाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान दोन नगरसेवक वाढतील, असा अंदाज आहे. प्रभाग रचना ही पूर्वीप्रमाणेच शहराच्या वाघोदा-पातोंडा शिवाराकडून सुरू होऊन शेवट भोणे, चौपाळे शिवाराकडे होणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण, मतदार संख्या या बाबींची रचना निवडणुकीच्या चार महिने आधी होणार आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारीला व चाचपणीला वर्षभर आधीपासूनच सुरुवात केली आहे.

दोघांना द्यावे लागणार मत

एका मतदाराला प्रभागात दोन मते द्यावी लागणार आहेत. अर्थात दोन जणांना निवडून द्यायचे असल्याने दोन उमेदवारांना मते द्यावी लागतील. गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष निवड असल्यामुळे प्रभागातील दोन किंवा तीन उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार असे तीन किंवा चार ठिकाणी मतदान करावे लागले होते. यामुळे मतदान यंत्रावर यावेळी उमेदवारांची गर्दी कमी राहणार आहे. गेल्या वेळी काही ठिकाणी दोन मतदान यंत्र लावावे लागले होते.

शहर विकासाचे काय?

प्रभाग पद्धतीमुळे शहर विकासाचे काय? असा प्रश्न काहींकडून उपस्थित केला जात आहे. कारण थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची बांधीलकी ही सर्वच शहराची असते. त्यामुळे सर्वच भागात त्यांना सारखा विकास व कामे करावी लागतात. तर प्रभाग पद्धतीत एका प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवक नगराध्यक्ष होत असतो. त्यामुळे विरोधकांच्या प्रभागात कामांबाबत दुजाभाव केला जात असतो, असा आरोप नेहमीच होत असतेा. प्रभाग पद्धतीत त्याचा तोटा राहण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

प्रभाग पद्धतीमुळे सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्यास संधी मिळते. अशा वेळी गरीब व सामान्य उमेदवाराचे भवितव्य उजाडते. त्यातून त्याला न्याय मिळतो. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीत संपूर्ण शहराशी अटॅचमेंट राहून थेट जनतेशी संपर्क येतो. अर्थात शासन निर्णयाचे स्वागत असून, त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी करणार आहोत.

-चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना नेते.