शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

मोड येथील निझरा नदीवर श्रमदानातून तीन ठिकाणी बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : निझरा नदीत मोड, ता.तळोदा येथे तीन ठिकाणी बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : निझरा नदीत मोड, ता.तळोदा येथे तीन ठिकाणी बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मोडसह परिसरातील पाणी पातळीत चांगल्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून चार लाख रुपये खर्च करीत निझरा नदीपात्रात 13 ठिकाणी पोकलॅण्डद्वारे खड्डे खोदल्याने यंदाच्या पावसाळ्यात एक हजार 200 मी.मी. पाऊस झाल्याने धनपूर धरण 16 मीटर्पयत भरून ओसंडून वाहू लागल्याने गेल्या महिन्याभरापासून नदीला दोन तीन वेळा पूर आला. दरम्यान नदी पात्रात खोदण्यात आलेल्या खड्डय़े पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील जलपातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. सातपुडय़ातून वाहत येणा:या निझरा नदीवर 2015 मध्ये धनपूर धरण बांधण्यात आले. परंतु गेल्या चार वर्षापासून नदीला पाणी नसल्याने नदी कोरडी ठाक पडली होती. त्यामुळे गेल्या वर्षी ग्रामस्थांनी एकत्र येत नदी पात्रात लोकवर्गणीच्या माध्यमातून नदी नांगरटीसह ठिकठिकाणी पोकलॅण्डद्वारे खड्डे केले. यंदाच्या पावसाळ्यात 47 इंचार्पयत पाऊस झाल्याने नदीतील खड्डे पूर्णपणे भरले असून, या नदीला अद्यापही पाणी सुरूच आहे. त्यामुळे येथील सरपंच जयसिंग माळी, पुरूषोत्तम चव्हाण, दिलीप पाटील, संजय थोरात, रामदास पाडवी, भारत पाडवी, रूबाब भिल, लक्ष्मण पाडवी, न्हानु महाराज आदींनी नदीवर ठिकठिकाणी श्रमदानातून बंधारे बांधून पाणी अडविले आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणारे जलसंकट टळण्यास मदत होणार आहे. 

गेल्या वर्षी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने या परिसरातील शेत शिवारातील कुपनलिका व विहिरी पूर्णत: आटल्याने शेतकरी व ग्रामस्थांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागल्याने यंदाच्या पावसाळ्यात नदीवर बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.