शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्हा परिषदेसाठी दुपारी १२ पर्यंत २४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हातील हा सहा तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५६ आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी दुपारी १२ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हातील हा सहा तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५६ आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत २४़८७ टक्के मतदान झाले़ दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तसेच नवापुर तालुक्यात मतदान केंंद्रांवर सर्वाधिक मतदानाची नोंद असून दुपारीही मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याचे दिसून येत होते़सहा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५६ आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी मतदार सकाळी सातपासून रांगा लावत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले होते़ दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा आणि नवापुर तालुक्यातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला़जिल्ह्यात सर्व सहा तालुक्यात १ हजार २२९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून १० लाख ४ हजार ८७३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक ६४ उमेदवार व पंचायत समितीसाठीही सर्वाधिक ९७ उमेदवार शहादा तालुक्यात आहेत.दुपारी १२ वाजेपर्यंत अक्कलकुवा तालुक्यात २६़८१ टक्के, धडगाव तालुक्यात १७़९६ टक्के, तळोदा तालुक्यात २५़२५ टक्के, शहादा तालुक्यात २२़२५ टक्के, नंदुरबार २६़११ टक्के तर सर्वाधिक २९़़७८ टक्के मतदान नवापुर तालुक्यात पार पडले होते़ अक्कलकुवा, धडगाव आणि नवापुर तालुक्यात मतदानाचा जोर वाढल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात दुपारपर्यंत २ लाख ४९ हजार ८९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ यात १ लाख २४ हजार ४३७ महिला तर १ लाख २५ हजार ५५३ पुरुष मतदारांचा समावेश आहे़नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी दहा गट व २० गणांसाठी आणि धडगाव तालुक्यात सात गट व १४ गण तर तळोदा तालुक्यात पाच गट व १० गणांसाठी निवडणूक होत आहे. चारही प्रमुख पक्षांनी अर्थात भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्टÑवादी यांनी यंदा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय भारतीय कम्युनिष्ट पार्टी, प्रहार, मनसे यांनीही काही ठिकाणी उमेदवार दिले आहेत. अनेक अपक्ष देखील रिंगणात आहेत. कुठेही आघाडी किंवा युती नसल्याने तिरंगी व चौरंगी लढती रंगल्या आहेत. पोलिसानीही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मतमोजणी बुधवार, ८ रोजी त्या त्या तालुकास्तरावर होणार आहे.