शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तीन पायांचे सरकार फार काळ धावणे शक्यच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त शेतकºयांना कर्जमुक्तीपासून दूर ठेवण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धडगाव व बोरद, ता. तळोदा येथील जाहीर प्रचार सभेत बोलतांना केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या धडगाव व बोरद, ता.तळोदा येथे सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकºयांना पारदर्शकपणे कर्जमाफी दिली होती. त्याचा लाभ शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर झाला. शेतकºयांना कर्जमुक्ती देवून सातबारा कोरा करणार, अशा खोट्या वल्गना केल्या. या उलट पुरवणी बजेटमध्ये एकही दमडीची तरतूद केली नाही. जिल्ह्यातील आदिवासी जनतेला सव्वा लाख घरे दिली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सडके बनविलीत, १८ हजार गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. नामांकीत शाळांमध्ये ५० हजार आदिवासी मुले चांगले शिक्षण घेत आहे. आदिवासी शेतकºयांना वनपट्टे देऊन सिंचन सुविधा दिली असल्याचे सांगून अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाची मुदत २०२० मध्ये संपत असतांना त्याआधीच त्यावर कायदा करून ते कायम केले. साहजिकच भाजपाचा या वाढता जनाधारामुळे विरोधक हतबल झाले. परिणामी भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तीन पक्षांची संधी साधू महाविकास आघाडी राज्यात सत्तारूढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन डॉ.शशिकांत वाणी यांनी केले.माजी जिल्हा प्रमुख नागेश पाडवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके, सुनील पाटील, राजेंद्रकुमार गावीत, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, शेतकरी आघाडीचे प्रमुख प्रविणसिंग राजपूत उपस्थित होते.जिल्ह्यातील नेते व आमदार फडणवीस यांच्यात जिल्ह्यातील गट व गणातील लढतींवर चर्चा होेऊन रणनिती आखली गेली. भाजपचीच सत्ता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी स्थानिक नेत्यांनी दिली. आमदार देवेंद्र फडणवीस यांनी देखील आवश्यक त्या सुचना यावेळी नेत्यांना दिल्या.