शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

तीन पायांचे सरकार फार काळ धावणे शक्यच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त शेतकºयांना कर्जमुक्तीपासून दूर ठेवण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धडगाव व बोरद, ता. तळोदा येथील जाहीर प्रचार सभेत बोलतांना केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या धडगाव व बोरद, ता.तळोदा येथे सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकºयांना पारदर्शकपणे कर्जमाफी दिली होती. त्याचा लाभ शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर झाला. शेतकºयांना कर्जमुक्ती देवून सातबारा कोरा करणार, अशा खोट्या वल्गना केल्या. या उलट पुरवणी बजेटमध्ये एकही दमडीची तरतूद केली नाही. जिल्ह्यातील आदिवासी जनतेला सव्वा लाख घरे दिली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सडके बनविलीत, १८ हजार गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. नामांकीत शाळांमध्ये ५० हजार आदिवासी मुले चांगले शिक्षण घेत आहे. आदिवासी शेतकºयांना वनपट्टे देऊन सिंचन सुविधा दिली असल्याचे सांगून अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाची मुदत २०२० मध्ये संपत असतांना त्याआधीच त्यावर कायदा करून ते कायम केले. साहजिकच भाजपाचा या वाढता जनाधारामुळे विरोधक हतबल झाले. परिणामी भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तीन पक्षांची संधी साधू महाविकास आघाडी राज्यात सत्तारूढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन डॉ.शशिकांत वाणी यांनी केले.माजी जिल्हा प्रमुख नागेश पाडवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके, सुनील पाटील, राजेंद्रकुमार गावीत, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, शेतकरी आघाडीचे प्रमुख प्रविणसिंग राजपूत उपस्थित होते.जिल्ह्यातील नेते व आमदार फडणवीस यांच्यात जिल्ह्यातील गट व गणातील लढतींवर चर्चा होेऊन रणनिती आखली गेली. भाजपचीच सत्ता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी स्थानिक नेत्यांनी दिली. आमदार देवेंद्र फडणवीस यांनी देखील आवश्यक त्या सुचना यावेळी नेत्यांना दिल्या.