शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

अवकाळीतील नुकसानीसाठी शासनाकडे तीन कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 30 कोटी रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आह़े या प्रस्तावानुसार जिल्ह्यात 6 हजार हेक्टर पिकांचे केवळ 33 टक्क्यांच्या नुकसान झाल्याने पंचनाम्यानुसार भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आह़े         जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती़ यातून शेतीपिकांचे नुकसान झाले होत़े या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाने केले होत़े या पंचनाम्यांचा अहवाल नुकसान जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आह़े पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देणे प्रस्तावित असून कोरड आणि बागायत क्षेत्रातील 10 हजार शेतकरी या भरपाईला पात्र ठरणार आहेत़ सर्व सहा तालुक्यात नुकसान झाल्याच्या शेतक:यांच्या दाव्याला या अहवालातून पुष्टी मिळत असून सर्वाधिक नुकसान धडगा, शहादा आणि अक्कलकुवा तालुक्यात झाल्याची माहिती देण्यात आली आह़े शासनाकडे देण्यात आलेल्या या प्रस्तावानंतर भरपाई देण्याची पुढील कारवाई नेमकी कशी होणार याकडे शेतक:यांसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आह़े नंदुरबार तालुक्यात एकूण 55़57 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून 78 शेतक:यांना 5 लाख रुपयांची मदत प्रस्तावित आह़े कोरड क्षेत्रात 52 तर फळपीक धारक 27 शेतक:यांचा समावेश आह़े नवापुर तालुक्यात 1 हजार 593 शेतक:यांच्या 506़25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े यासाठी 34़58 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आह़े 1 हजार 589 शेतकरी हे कोरडवाहू क्षेत्रधारक तर 4 शेतकरी फळपिकधारक आहेत़ अक्कलकुवा तालुक्यात तब्बल 1 हजार 869 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े 3 हजार 965 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसल्याने त्यांना 1 कोटी 27 लाख 28 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आह़े शहादा तालुक्यात 2 हजार 68 शेतक:यांच्या 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 4 लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आह़े तालुक्यात 2 हजार 58 कोरडवाहू शेतक:यांचे नुकसान झाले आह़े धडगाव तालुक्यात 3 हजार 173 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसला आह़े यातून 1 हजार 857 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 26 लाख 36 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यात 8 शेतक:यांच्या 4 हेक्टरचे नुकसान झाले आह़े जिल्ह्यात आजघडीस तब्बल 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे पूर्ण झालेल्या पंचनाम्यातून स्पष्ट करण्यात आले आह़े यात        5 हजार 788 हेक्टर हे कोरडवाहू क्षेत्र आह़े तर 22 हेक्टर क्षेत्र हे बागायती आह़े या संपूर्ण नुकसानीसाठी शासनाकडे 3 कोटी 8 लाख 23 हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव देण्यात आला आह़े मोठा गाजावाजा करत प्रशासनाकडून अवकाळीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर समाधान व्यक्त होत असले तरी नंदुरबार तालुक्यात खरीप नुकसानीची स्थिती आणि पंचनाम्यांची आकडेवारी यात तफावत असल्याचे मत शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यातही दीड हजार हेक्टरच्या जवळपास पिकांना बाधा पोहोचूनही बोटावर मोजण्याएवढेच पंचनामे पूर्ण करत अहवाल दिल्याने नाराजी व्यक्त होत आह़े ही मदत नेमकी कधी मिळेल याकडे लक्ष लागून आह़े