शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

अवकाळीतील नुकसानीसाठी शासनाकडे तीन कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 30 कोटी रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आह़े या प्रस्तावानुसार जिल्ह्यात 6 हजार हेक्टर पिकांचे केवळ 33 टक्क्यांच्या नुकसान झाल्याने पंचनाम्यानुसार भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आह़े         जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती़ यातून शेतीपिकांचे नुकसान झाले होत़े या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाने केले होत़े या पंचनाम्यांचा अहवाल नुकसान जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आह़े पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देणे प्रस्तावित असून कोरड आणि बागायत क्षेत्रातील 10 हजार शेतकरी या भरपाईला पात्र ठरणार आहेत़ सर्व सहा तालुक्यात नुकसान झाल्याच्या शेतक:यांच्या दाव्याला या अहवालातून पुष्टी मिळत असून सर्वाधिक नुकसान धडगा, शहादा आणि अक्कलकुवा तालुक्यात झाल्याची माहिती देण्यात आली आह़े शासनाकडे देण्यात आलेल्या या प्रस्तावानंतर भरपाई देण्याची पुढील कारवाई नेमकी कशी होणार याकडे शेतक:यांसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आह़े नंदुरबार तालुक्यात एकूण 55़57 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून 78 शेतक:यांना 5 लाख रुपयांची मदत प्रस्तावित आह़े कोरड क्षेत्रात 52 तर फळपीक धारक 27 शेतक:यांचा समावेश आह़े नवापुर तालुक्यात 1 हजार 593 शेतक:यांच्या 506़25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े यासाठी 34़58 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आह़े 1 हजार 589 शेतकरी हे कोरडवाहू क्षेत्रधारक तर 4 शेतकरी फळपिकधारक आहेत़ अक्कलकुवा तालुक्यात तब्बल 1 हजार 869 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े 3 हजार 965 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसल्याने त्यांना 1 कोटी 27 लाख 28 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आह़े शहादा तालुक्यात 2 हजार 68 शेतक:यांच्या 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 4 लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आह़े तालुक्यात 2 हजार 58 कोरडवाहू शेतक:यांचे नुकसान झाले आह़े धडगाव तालुक्यात 3 हजार 173 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसला आह़े यातून 1 हजार 857 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 26 लाख 36 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यात 8 शेतक:यांच्या 4 हेक्टरचे नुकसान झाले आह़े जिल्ह्यात आजघडीस तब्बल 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे पूर्ण झालेल्या पंचनाम्यातून स्पष्ट करण्यात आले आह़े यात        5 हजार 788 हेक्टर हे कोरडवाहू क्षेत्र आह़े तर 22 हेक्टर क्षेत्र हे बागायती आह़े या संपूर्ण नुकसानीसाठी शासनाकडे 3 कोटी 8 लाख 23 हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव देण्यात आला आह़े मोठा गाजावाजा करत प्रशासनाकडून अवकाळीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर समाधान व्यक्त होत असले तरी नंदुरबार तालुक्यात खरीप नुकसानीची स्थिती आणि पंचनाम्यांची आकडेवारी यात तफावत असल्याचे मत शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यातही दीड हजार हेक्टरच्या जवळपास पिकांना बाधा पोहोचूनही बोटावर मोजण्याएवढेच पंचनामे पूर्ण करत अहवाल दिल्याने नाराजी व्यक्त होत आह़े ही मदत नेमकी कधी मिळेल याकडे लक्ष लागून आह़े