शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु पावसाळा तोंडावर आलेला असतांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु पावसाळा तोंडावर आलेला असतांना साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे म्हणजे तारेवरची कसरत राहणार आहे. ही बाब लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकºयांच्या कापसाची तपासणी जागेवर जावून करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. यामुळे शेतकºयांच्या जिवात जीव आला आहे.जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकºयांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी शिल्लक कापसाची माहिती घेण्यासाठी नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकºयांकडे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी व पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंत्रणेला दिले आहेत.शासनाने २४ एप्रिल पासून राज्यात कापूस खरेदीस पुन्हा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील शेतकºयांकडे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे. २६ मे अखेर नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार ५४८ कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. २ हजार २०१ शेतकºयांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली. विविध कारणामुळे जिल्ह्यातील ३ हजार ३४७ नोंदणीकृत शेतकºयांचा कापूस विक्री होणे बाकी आहे. राज्यात कापूस खरेदीचे बाजार मुल्य दर व शासनाचे हमीभाव दर यामध्ये तफावत आहे. कापूस खरेदीचे शासनाचे हमीदर हे बाजारातील दरापेक्षा जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील काही व्यापारी हे शेतकºयांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता आहे. तसेच लवकर पावसाळ्यास सुरूवात होणार असून जिल्ह्यातील नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकºयांकडे विक्रीसाठी शिल्लक कापसाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करण्याचे आदेश सहायक निबंधक, सहकारी संस्था यांना देण्यात आले आहेत.पथकाची नेमणूकशेतकºयाकडील शिल्लक कापसाची माहिती संकलनासाठी तहसिलदारामार्फत नियोजन करण्यात येणार आहे. तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावनिहाय याद्या प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबधीत शेतकºयाच्या सातबारा उताºयावरील कापूस पिकाखाली एकूण क्षेत्राची आणि शिल्लक कापसाची खात्री करण्यासाठी कापूस साठ्याचे शेतकºयासह फोटो घ्यावेत. ही प्रक्रीया दोन दिवसात पूर्ण करावी. गाव निहाय तपासणी पंचनामा झालेल्या यादीपैकी प्रत्येकी १० टक्के याद्यांची फेरतपासणी संबधीत तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी केल्यानंतर गावानिहाय याद्या संबधित तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहायक निबंधक यांच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी देणे आवश्यक आहे.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी तपासणी झालेल्या यादीप्रमाणे संबंधित कृषी उत्पन्न बाजारसमितीमार्फत यादीत नमूद शेतकऱ्यांचा कापूस प्राथम्याने खरेदी केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली खाजगी व्यापाºयांनी खरेदी केलेला कापूस बाजार समितीत विक्रीसाठी येणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचेकडील नोंदणीकृत शेतकºयांची कापूस खरेदी प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाप्रमाणे करण्यात येईल. याबाबत शेतकºयाची कोणतीही तक्रार येणार नाही यासाठी सहायक निबंधकानी उपाययोजना करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.