शहरं
Join us  
Trending Stories
1
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
2
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
3
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
4
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
5
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
6
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
7
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
8
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
9
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
10
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
11
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
12
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
13
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
14
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
15
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
16
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
17
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
18
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?
19
IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा
20
या देशात जन्माला येणार जगातील 50% मुलं, कमी होऊ लागणार भारताची लोकसंख्या; टेन्शन वाढवणारा आहे तज्ज्ञांचा अनुमान

जिल्ह्यातील २४ केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला़ तळोदा आणि खोंडामळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला़ तळोदा आणि खोंडामळी ता़ नंदुरबार वगळता सर्वच ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती असून परीक्षा बंदोबस्तासाठी यंदा होमगार्ड नसल्याने पोलीस दलाच्या मात्र अडचणी वाढल्याचे दिसून आले़नाशिक विभागीय परीक्षा मंडळाकडून बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरुवात झाली़ परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून १६ हजार ४६९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ यासाठी २४ परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ आज पहिला पेपर असल्याने सकाळपासूनच पालक व परीक्षार्थी नंबर शोधण्यासाठी परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. परीक्षार्थी एकमेकांना शुभेच्छा देत होते. तर पालक शांततेत पूर्ण पेपर लिहिण्याचा सूचना विद्यार्थ्यांना देत होते. सकाळी दहा वाजेपासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व विद्यार्थिनींची शिक्षक शिक्षकांकडून तपासणी करण्यात येत होती़ विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅग इतर मौल्यवान वस्तू , हॅन्ड बॅग पॉकेट किंवा इतर साहित्याला परीक्षा केंद्रावर बंदी करण्यात आलेली होती़ नंदुरबार शहरात चार, नंदुरबार तालुका तीन, तळोदा एक, शहादा सहा, अक्कलकुवा तालुक्यातील चार, नवापुर तालुक्यात पाच तर धडगाव तालुक्यातील एका केंद्रांवर परीक्षा केंद्रावर आधीपासून तयारी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अडचणी आल्या नव्हत्या़ परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सुरळीत पार पडल्याची माहिती देण्यात आली आहे़दोघे डिबारपरीक्षेदरम्यान दुपारी तळोदा येथील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर दोघा विद्यार्थ्यांवर डायटचे प्राचार्य जालिंदर सावंत यांनी कारवाई केली़ प्राचार्य सावंत यांच्या भेटीदरम्यान केंद्रात विद्यार्थ्यांची झडती घेणे सुरु असताना दोघांकडे कॉपी आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात आली़दरम्यान गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील होमगार्ड यांना पगार मिळत नसल्याने गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्यावर नसल्याचे चित्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी दिसून आले़ बारावीची परीक्षा आणि शिवजयंती या दोन्ही अतीमहत्त्वपूर्ण उपक्रमांवेळी बंदोबस्तासाठी होमगार्ड कर्मचारी नसल्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले होते़ मंगळवारी परीक्षा केंद्रांवर पोलिसांवरच जादा भार आल्याने त्यांची दमछाक झाली होती़ याबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही़नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी सकाळपासून उपाययोजना करण्यात येत होत्या़ यातून बºयाच ठिकाणी परीक्षा निकोप वातावरणात पार पडल्याचा दावा करण्यात आला़शेतशिवारातून पळाले हुल्लडबाजइंग्रजीच्या पहिल्याच पेपरसाठी प्रविष्ठ झालेल्या ६ हजार ४५९ पैकी १६ हजार २११ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ सर्व २४ केंद्रातून २५६ विद्यार्थी गैरहजर होते़शिक्षण विभागाने यंदा कॉपीमुक्त अभियान राबवल्याने त्याचा परिणाम दिसून आला परंतू खोंडामळी ता़ नंदुरबार येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाबाहेर हुल्लडबाजी झाल्याने पळापळ झाली़ कॉपी पुरवण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी जमली होती़ या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीसांकडून कारवाई होताच अनेकांनी मोटारसायकली सोडून पळ काढला़ यातून शाळेच्या मागे जागोजागी दुचाकी पडून असल्याचे दिसून आले़ अनेकजण शेतशिवारातून पळत सुटले होते़