शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

बाहेरगावाहून आले २२ हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल २३ हजार नागरिक परतले आहेत़ येथील मूळ रहिवासी असलेल्या या नागरिकांचे मोठ्या शहरांमध्ये हाल होण्याची शक्यता असल्याने त्यांनी गावाची वाट धरली होती़ या सर्वांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून एकासही कोरोनासारखी लक्षणे असलेले किरकोळ आजार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़देशात कोरोनाचे संकट घोंघावू लागल्यानंतर जिल्ह्यातून नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक यासह राज्यातील इतर मोठी शहरे आणि देशातील इतर शहरांमध्ये निवास करणाऱ्यांनी जिल्ह्याची वाट धरली होती़ मिळेल त्या वाहनाने या ‘भूमीपुत्रां’चे लोंढे जिल्ह्यात येत होते़ या लोंढ्यांमधून कोरोनाचा फैलाव होण्याची भिती असल्याने पोलीस दलाने जिल्हा आणि राज्य सीमेवर त्यांची तपासणी केी होती़ या सर्वांची सिमेवर तपासणी करण्यात आल्यानंतर घरीही त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या पथकांनीही भेटी दिल्या होत्या़ यातून या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती असून एकातही कोरोनाची लक्षणे किंवा तत्सम आजारही नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आणि तलाठी यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या या पथकांकडून दर दिवशी घेतल्या जाणाºया आढाव्यामुळे रोज सद्यस्थिती समोर येत आहे़ दरम्यान जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्यांचे लोंढे थांबलेले नसून दरदिवशी नागरिक मिळेल त्या मार्गाने येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पोलीस प्रशासनाकडून ९ ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर येणाºया नागरिकांच्या लोंढ्यामुळे चिंता असली तरी त्यांच्या आरोग्य तपासणीला प्रथम प्राधान्य दिले जात आहे़

आरोग्य विभागाने बाहेरगावाहून आलेल्या २२ हजार ८०० नागरिकांच्या आतापर्यंत तपासण्या पूर्ण केल्या आहेत़यात नवापुर येथील एकास सर्दी, खोकला आणि ताप असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते़ नवापुरचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी त्याच्या कुटूंबाची भेट घेत माहिती जाणून घेतली असता, संबधित व्यक्ती हा पुणे येथून आल्याचे सांगण्यात आले होते़ त्याचे स्वॅब नमुने पुणे येथे एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते़ दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या १० दिवसात नंदुरबार तालुक्यात ८ हजार ३७२, शहादा ६ हजार ३६१, तळोदा ८३५, अक्कलकुवा ३ हजार ७००, नवापुर तालुक्यात १ हजार ८८२ तर धडगाव तालुक्यात १ हजार ५६० बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ या २२ हजार ८०० पैकी एकासही कोरोनासदृश लक्षणे नसून त्यांच्या प्रकृतीवर ग्रामसमित्या लक्ष ठेवून आहेत़दक्षता म्हणून आरोग्य विभागाकडून तालुकानिहाय किमान ५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे पथक दरदिवशी क्वारंटाईन नागरिकांची चौकशी करुन अहवाल आरोग्य विभागाकडे देत आहेत़शहादा तालुक्यात ३ हजार ३४६ नागरिकांचे दक्षता म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते़ यात २० जण हे परदेशातून आले असल्याची माहिती देण्यात आली होती़ सर्व २० जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्यानंतर या सर्वांची प्रकृती सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान शुक्रवारपासून जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने आशा आणि अंगणवाडी सेविका यांचे पथक घरोघरी पुन्हा सर्वेक्षण करणार असून त्यांच्याकडून किरकोळ आजारींची माहिती संकलित होणार आहे़