शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
2
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
3
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
4
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
5
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
6
WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी
7
ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
8
बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण?
9
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
10
Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
11
Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन!
12
VIDEO: बापरे... पुराच्या पाण्यात दिसला महाभयानक साप, थायलंडच्या लोकांमध्ये प्रचंड घबराट
13
बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली, ढसाढसा रडली; कुटुंबाला संशय, पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन्...
14
कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?
15
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
16
WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार!
17
Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय!
18
या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
19
Viral Story: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाचले लग्न! एका व्यक्तीने सोशल मीडियावर सांगितली कहाणी
20
आयपीओंमुळे गुंतवणूकदार मालामाल; ६६ टक्के कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशी दिला दमदार नफा 
Daily Top 2Weekly Top 5

डिबीटीविरोधात तळोदा व नंदुरबारात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:30 IST

नंदुरबार : राज्य शासनाने लागू केलेला भोजन डिबीटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघर्ष समिती आणि आदिवासी हक्क संरक्षण समिती यांच्यावतीने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थी उपस्थित होत़े सकाळी 11 वाजेपासून तळोदा आणि नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ...

नंदुरबार : राज्य शासनाने लागू केलेला भोजन डिबीटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघर्ष समिती आणि आदिवासी हक्क संरक्षण समिती यांच्यावतीने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थी उपस्थित होत़े सकाळी 11 वाजेपासून तळोदा आणि नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आवारात ठिय्या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली होती़ विद्याथ्र्यानी आवारातच बसून घोषणाबाजी सुरू केली होती़ नंदुरबार प्रकल्पाधिकारी वान्मती सी़ आणि तळोदा प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े नंदुरबार येथे झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, नंदुरबार पालिकेचे बांधकाम सभापती कुणाल वसावे यांनी सहभाग घेत शासनाच्या धोरणाचा निषेध केला़ राज्यातील विविध भागात एकाच वेळी हे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी संघर्ष समितीकडून देण्यात आली़  निवेदनावर अॅड़ पद्माकर वळवी यांच्यासह दिपक मोरे, अजरुन वळवी, नाथ्या खाज्या पावरा, पंचायत समिती सभापती शांतीबाई दिवाकर पवार, दिवाकर पवार, भगवान पाडवी, राजकुमार पाडवी, आकाश वळवी, सिताराम रहासे, पूनम पाडवी, उखडय़ा वळवी, गुलाबसिंग डुमकूळ यांच्या सह्या आहेत़ तळोदा येथे माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वात विद्याथ्र्याचे ठिय्या आंदोलन करण्यात आल़े प्रसंगी माजी सभापती सी़क़ेपाडवी, प्रकाश ठाकरे, विक्रम पाडवी, विद्यार्थी संघर्ष समितीचे अॅड़ गजमल रतनसिंग वसावे, अॅड़सरदारसिंग रूपसिंग वसावे,  अॅड़ अनिल किर्ता वळवी यांच्यासह तळोदा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होत़े  राज्यातील 29 प्रकल्प कार्यालयांमध्ये विद्यार्थी संघर्ष समितीकडून हे आंदोलन करण्यात आले होत़े विद्याथ्र्यासोबत विद्यार्थिनीही उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ विद्याथ्र्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात डिबीटीचा निर्णय रद्द करण्यात यावा, पुणे ते नाशिक या दरम्यान पदयात्रा काढणा:या विद्याथ्र्याना अटक करून डांबून ठेवणारे पोलीस अधिकारी व आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी कर्मचा:यांवर कारवाई व्हावी, वसतीगृह प्रवेश व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यात यावेत, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात येऊन सामाजिक न्याय विभागाचे धोरण अंमलात आणावे, वसतीगृहासाठी शासकीय इमारती ह्या शहराच्या मध्यवर्ती भागात त्वरीत बांधण्यात याव्यात, विभागीय व जिल्हास्तरावर वसतीगृह प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी, 6 जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाची त्वरीत अंमलबजावणी करून बोगस आदिवासी विरोधात कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावेत तसेच आश्रमशाळेत सुविधा देण्याची मागणी करण्यात आली़