शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

डिबीटीविरोधात तळोदा व नंदुरबारात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:30 IST

नंदुरबार : राज्य शासनाने लागू केलेला भोजन डिबीटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघर्ष समिती आणि आदिवासी हक्क संरक्षण समिती यांच्यावतीने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थी उपस्थित होत़े सकाळी 11 वाजेपासून तळोदा आणि नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ...

नंदुरबार : राज्य शासनाने लागू केलेला भोजन डिबीटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघर्ष समिती आणि आदिवासी हक्क संरक्षण समिती यांच्यावतीने नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थी उपस्थित होत़े सकाळी 11 वाजेपासून तळोदा आणि नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आवारात ठिय्या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली होती़ विद्याथ्र्यानी आवारातच बसून घोषणाबाजी सुरू केली होती़ नंदुरबार प्रकल्पाधिकारी वान्मती सी़ आणि तळोदा प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े नंदुरबार येथे झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, नंदुरबार पालिकेचे बांधकाम सभापती कुणाल वसावे यांनी सहभाग घेत शासनाच्या धोरणाचा निषेध केला़ राज्यातील विविध भागात एकाच वेळी हे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी संघर्ष समितीकडून देण्यात आली़  निवेदनावर अॅड़ पद्माकर वळवी यांच्यासह दिपक मोरे, अजरुन वळवी, नाथ्या खाज्या पावरा, पंचायत समिती सभापती शांतीबाई दिवाकर पवार, दिवाकर पवार, भगवान पाडवी, राजकुमार पाडवी, आकाश वळवी, सिताराम रहासे, पूनम पाडवी, उखडय़ा वळवी, गुलाबसिंग डुमकूळ यांच्या सह्या आहेत़ तळोदा येथे माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वात विद्याथ्र्याचे ठिय्या आंदोलन करण्यात आल़े प्रसंगी माजी सभापती सी़क़ेपाडवी, प्रकाश ठाकरे, विक्रम पाडवी, विद्यार्थी संघर्ष समितीचे अॅड़ गजमल रतनसिंग वसावे, अॅड़सरदारसिंग रूपसिंग वसावे,  अॅड़ अनिल किर्ता वळवी यांच्यासह तळोदा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होत़े  राज्यातील 29 प्रकल्प कार्यालयांमध्ये विद्यार्थी संघर्ष समितीकडून हे आंदोलन करण्यात आले होत़े विद्याथ्र्यासोबत विद्यार्थिनीही उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ विद्याथ्र्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात डिबीटीचा निर्णय रद्द करण्यात यावा, पुणे ते नाशिक या दरम्यान पदयात्रा काढणा:या विद्याथ्र्याना अटक करून डांबून ठेवणारे पोलीस अधिकारी व आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी कर्मचा:यांवर कारवाई व्हावी, वसतीगृह प्रवेश व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यात यावेत, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात येऊन सामाजिक न्याय विभागाचे धोरण अंमलात आणावे, वसतीगृहासाठी शासकीय इमारती ह्या शहराच्या मध्यवर्ती भागात त्वरीत बांधण्यात याव्यात, विभागीय व जिल्हास्तरावर वसतीगृह प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी, 6 जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाची त्वरीत अंमलबजावणी करून बोगस आदिवासी विरोधात कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावेत तसेच आश्रमशाळेत सुविधा देण्याची मागणी करण्यात आली़