सविस्तर वृत्त असे की, ब्राह्मणपुरी येथे शहादा-खेतिया रस्त्यावर किराणा दुकाने आहेत. त्यांनी आपल्या अंगणात नेहमीप्रमाणे खाद्यतेलाने भरलेले बॅरल ठेवले होते. नेहमीप्रमाणे दीपक जैन हे मंगळवारी सकाळी किराणा दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना १८० लिटरच्या खाद्यतेलाचे बॅरल दिसून आले नाही. त्यांनी लागलीच परिसरात शोध घेतला असता जवळच असलेल्या पारसमल जैन व राकेश तावडे यांचेदेखील १८० किलोच्या खाद्यतेलाचे बॅरल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. ब्राह्मणपुरी येथील तिन्ही किराणा दुकानदारांचे प्रत्येकी एक-एक खाद्यतेलाचे बॅरल लंपास करून चोरांनी पोबारा केला. एका बॅरलची किंमत २२ ते २३ हजार असून, तिन्ही बॅरलची किंमत सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
एकाच रात्री नियोजन पद्धतीने चोरी
एकाच रात्री चोरट्यांनी नियोजनात्मक पद्धतीने खाद्यतेल लंपास केल्याची बाब उघडीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील किराणा दुकानासह शेतकऱ्यांच्या शेतीउपयोगी वस्तूदेखील बाहेर उघड्यावर राहत असल्याने अशाप्रकारे चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहादा पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे. तसेच पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्याने चोरट्यांना चोरी करण्याचे धाडस निर्माण होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसविण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.