शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
2
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
3
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
4
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
5
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
6
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
7
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
8
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
9
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
10
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
11
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
12
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
13
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
14
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
15
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
16
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
17
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
18
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
19
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
20
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...

डबल हॅटट्रीक होणार की करिश्मा घडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:49 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रचारातील उदासिनता, दोन कट्टर विरोधक एकत्र झाल्याने बदललेले राजकीय समिकरणे, दुबळ्या ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचारातील उदासिनता, दोन कट्टर विरोधक एकत्र झाल्याने बदललेले राजकीय समिकरणे, दुबळ्या झालेल्या काँग्रेसचा ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा निर्णय आणि एकुणच प्रचारातील उदासिनता यामुळे नंदुरबार मतदार संघात जिल्ह्यातील चारही मतदारसंघाच्या तुलनेत सर्वात कमी मतदान झाले. कमी झालेल्या मतदानाचा फटका कुणाला बसतो याकडे आता लक्ष लागून आहे. दरम्यान, करिश्मा घडेल असे काँग्रेसतर्फे सांगितले जात आहे तर सलग दुसरी हॅटट्रीक साधून मोठय़ा मताधिक्याने भाजप उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत निवडून येतील असा दावा भाजपने नेत्यांनी केला      आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते यंदाच्या निवडणुकीत बदलली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत एकतर्फी वाटणारी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसतर्फे भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगतदार झाली. यामुळे प्रचारात रंग भरला जाईल आणि निवडणूक अतीटतीची होईल असे बोलले जात असतांना एकाकी पडलेल्या कॉंग्रेसला शेवटर्पयत सूर सापडला नाही. परिणामी भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी देखील प्रचाराबाबत फारसे गांभिर्य दाखविले नाही. एकाही मोठय़ा नेत्याची सभा मतदारसंघात झाली नाही. राजकीय वातावरणच तापले नसल्याने मतदारसंघात सहाजिकच मतदानाची टक्केवारी घटली. गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. कट्टर वैरी झाले मित्रनंदुरबार मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशी विळ्याभोपळ्याचे राजकीय शत्रुत्व होते. परंतु   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेची वाट धरल्याने आणि युती धर्माचे पालन केल्याने कार्यकत्र्यानीही निष्ठेने काम केले. त्यामुळे गावागावातील पारंपारिक विरोधक एकत्र आल्याने देखील प्रचारातील उदासिनता दिसून आली. त्याचा परिणाम सहाजिकच मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. गेल्यावेळीही सर्वात कमी2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील जिल्ह्यातील चारही मतदार संघापैकी नंदुरबारातच सर्वात कमी मतदान झाले होते. अवघे 61.67 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजपचे डॉ.विजयकुमार गावीत हे 27 हजारापेक्षा अधीक मताधिक्याने निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत 62.92 टक्के मतदान झाले होते.  त्यावेळी भाजप उमेदवाराला तब्बल 70 हजारापेक्षा अधीक मताधिक्य होते. कमी मतदानाचा फटका? यंदा कमी मतदानाचा फटका प्रस्थापीत उमेदवारांना बसतो किंवा कसा याबाबत मतेमतांतरे आहेत. डॉ.विजयकुमार गावीत निवडून आल्यास ते मतदारसंघात डबल हॅटट्रीक करतील. जिल्ह्यात आमदारकीची डबल हॅटट्रीक करणा:यांमध्ये ते दुसरे राहतील. आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी डबल हॅटट्रीक केली आहे.     

..असे झाले मतदान

नंदुरबार मतदारसंघात एकुण तीन लाख 38 हजार 941 मतदार आहेत. त्यात 1,70,567 पुरुष तर 1,68,367 महिला आणि पाच तृतीयपंथी होते. त्यापैकी 97,334 पुरुष तर 90,037 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकुण एक लाख 87 हजार 373 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी अर्थातच 55.28 इतकी राहीली आहे.

नेहमीप्रमाणे शहरी भागात मतदानाची उदासिनता दिसून आली. शिवाय जे मोठी गावे आणि संवेदनशील म्हणून ओळखली जात होती त्या गावांमधील मतदानाची टक्केवारी देखील यंदा घटली आहे. प्रशासनाने मतदानाची विविध माध्यमातून जनजागृती करूनही ही अवस्था राहीली.

डॉ.विजयकुमार गावीत -जमेची बाजू - पारंपारिक व कट्टर विरोधकी चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना मतदारसंघात विरोधकच उरला नाही. त्यामुळे एकतर्फी प्रचार राहिला. त्याचा फायदा त्यांना मिळाला. उणिवा - विरोधक प्रभावी नसल्यामुळे प्रचारात उदासिनता दिसून आली. अनेक पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना गावीत व रघुवंशी यांची जवळीकता पचनी पडली नाही. शिवाय मोठय़ा नेत्याची सभा नाही.

उदेसिंग पाडवी - जमेची बाजू -  गावीत व रघुवंशी यांची युती पचनी न पडल्याने नाराज गटाची छूपी साथ मिळाली. माजी आमदार असल्याने व अनेक निवडणुका लढण्याचा अनुभव असल्यामुळे निवडणुकीचे मॅनेजमेंट करतांना ते उपयोग पडल्याचे चित्र दिसून आले.  उणिवा - भाजपचे आमदार असतांना ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. परिणामी नियोजनाला वाव मिळाला नाही. कार्यकर्ते नसल्यामुळे प्रचार सर्वच ठिकाणी करता आला नाही.

दीपा वळवी - जमेची बाजू - वंचीत बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघात ब:यापैकी असल्यामुळे आणि उच्चशिक्षीत उमेदवार असल्यामुळे लक्ष वेधून घेतले. काही ठिकाणी प्रचार सभा घेवून भुमिका मांडल्याने ब:यापैकी प्रचार दिसून आला. उणिवा- निवडणूक लढविण्याचा पहिलाच प्रसंग, मोठय़ा नेत्याची न झालेली सभा आणि साधनांचा अभाव दिसून आला.