शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पाणी साठले अन् नयनी अश्रू दाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या १० दिवसात कोसळलेल्या पावसामुळे शेतीपिके हातची गेली आहेत़ यामुळे शेतात पाणी अन् ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या १० दिवसात कोसळलेल्या पावसामुळे शेतीपिके हातची गेली आहेत़ यामुळे शेतात पाणी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अशी स्थिती आहे़ शेतातील पाणी काढण्यास जागा नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र असून पिके हातून गेल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरवत रब्बी हंगामाच्या तयारीची वाटचाल सुरू केली आहे़जिल्ह्यात संथ सुरूवात करणाºया पावसाने जुलै ते आॅगस्ट दरम्यान मुसळधार हजेरी लावली आहे़ परिणामी सुस्थितीत असलेली पिके नुकसानीच्या गर्तेत सापडली आहेत़ आॅगस्ट महिन्यात २७ हजार शेतकरी आधीच बाधित झाले होते़ यात पुन्हा सप्टेंबर महिन्यात सलग १० दिवस कोसळलेल्या पावसात उरली सुरली पिकेही हातची गेली असून सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पंचनामे अद्यापही पूर्णपणे सुरू झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ गेल्या वर्षीची अतीवृष्टी, मार्चपासून थैमान घालणारा कोरोना आणि आता पुन्हा संततधारेने झालेले नुकसान यामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे़ यामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढणार आहे़ ‘लोकमत’ने जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात नुकसानीचा आढावा घेत पाहणी केली असता, चार दिवस उलटूनही शेतात पाणी साठून असल्याने पिकांवर मर आल्याचे दिसून आले़ धान्यपिके, कापूस, फळ पिके आणि तेलबिया पिके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत़ यातून शेतातील चांगली पिकेही रोगराईच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे़

 जिल्ह्यात यंदा २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या आहेत़ यात यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७४ हजार ८६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १७ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ९८१ हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे़